जळगाव तालुक्यातील धानोरा येथील श्रीराम तानकू महाजन (६५) यांचे उष्माघाताने बुधवारी निधन झाले.
जळगाव- जळगाव तालुक्यातील धानोरा येथील श्रीराम तानकू महाजन (६५) यांचे उष्माघाताने बुधवारी निधन झाले. सध्या तालुक्यात तापमानात कमालीची वाढ झाली असून धरणगावचे तापमान जिल्ह्यात दुस-या क्रमांकाचे आहे. त्याचप्रमाणे पारोळा तालुक्यातील वंजारी गावातही उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रोजंदारीवर कामास गेलेले श्रीराम महाजन उन्हामुळे चक्कर आल्याने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र महाजन यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यात त्यांचे निधन झाले. तर पारोळा तालुक्यातील वंजारी येथे उष्माघाताचा बळी गेला आहे. वंजारी येथील गोपाल भिल (३५) यांचा बुधवारी मृत्यू झाला.