वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अपघातात संपूर्ण शरीर अर्धागवायूने निकामी झाले असतानाही तोंडात लाकूड धरून की-बोर्डवर लेख टाइप करून जीवनाचा अर्थ सांगणारे वैमानिक एम. पी. अनिलकुमार (वय-५०) काळाच्या पडद्याआड गेले.
पुणे – हवाई दलाचे ‘मिग २१’ या लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून नावलौकिक मिळविलेले आणि वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अपघातात संपूर्ण शरीर अर्धागवायूने निकामी झाले असतानाही तोंडात लाकूड धरून की-बोर्डवर लेख टाइप करून जीवनाचा अर्थ सांगणारे वैमानिक एम. पी. अनिलकुमार (वय-५०) काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दापोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या अपंगत्वावर मात करून तोंडात पेन धरून अपंगत्व, सनिक, सुरक्षा आणि जीवनाविषयी लिहिलेले लेख लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवले.
अनिलकुमार हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व होते. उत्कृष्ट धावपटूबरोबरच ते चांगले जिमनॅस्ट होते. ट्रेिनग घेत असताना त्यांना दुर्मीळ अशा ‘सिल्व्हर टॉर्च’ने सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विमान उड्डाणाबरोबरच आपल्यातील विविध कौशल्ये दाखवायला सुरुवात केली.
याच काळात पठाणकोट येथे त्यांचा दुर्दैवाने अपघात झाला. त्यांचे संपूर्ण शरीरच लुळे पडले. ‘तो’ अपघात झाला नसता तर अनिलकुमार यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली असती. मात्र त्यांनी हिंमत हरली नाही. लेखणीच्या माध्यमातून जीवनाशीच युद्ध सुरू ठेवले आणि ते जिंकतही गेले.
त्यांचे अनेक लेख गाजले. ‘बालभारती’ने त्यांच्या लेखाची दखल घेत अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला. या धडय़ामुळे अनेक शालेय विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी मिलिटरीच्या पॅराप्लेजीक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जात असत. केरळमध्येही त्यांचा लेख अभ्यासक्रमात लावला गेला. त्यांचा ‘एयरबोर्न टू चेअरबोर्न’ हा लेख
तर खूप गाजला. इथूनच त्यांच्या ‘लेखक’ म्हणून करिअरची सुरुवात झाली.
अनिलकुमार यांची १९८० मध्ये पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत निवड झाली. तीन वर्षाच्या कठीण प्रशिक्षणानंतर त्यांची निवड आणखी कठीण असलेल्या एका ट्रेनिंगसाठी झाली. २४ वर्षाचा हा युवक हसत हसत ते आव्हान पार करतो. त्यानंतर त्यांची नियुक्ती हवाई दलात मिग २१ विमानावर झाली.
२८ जून १९८८मध्ये पठाणकोट येथे रात्रीच्या वेळी विमानतळावरून ते निवासस्थानी मोटारसायकलवरून जात असताना त्यांना गंभीर अपघात झाला. त्यात त्यांच्या मानेच्या मणक्याला मार लागल्यामुळे त्यांना अर्धागवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे सर्व शरीर लुळे पडले. तेव्हापासून त्यांना खडकी येथील लष्करी रुग्णालयात ठेवले होते.
येथून त्यांना मिलिटरीच्या पॅराप्लेजीक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले. ‘त्या’ अपघातापासून आजपर्यंत ते इथेच वास्तव्यास होते. त्यांनी संगणकालाच आपला साथीदार मानले आणि लेखन सुरू केले. अनिलकुमार हे कुणाच्या मदतीशिवाय उठू-बसू शकत नव्हते.
मात्र, ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनेकांना आपलेसे केले. ते नेहमीच सांगत आले आहेत, की ‘हिंमत न हारो, संघर्ष करो, जूझते रहो, सफलता अवश्य मिलेगी. संघर्ष जितना अधिक तीखा और कठिन होगा, उसका फल उतना ही मीठा मिलेगा’
सैनिकांसाठी मार्गदर्शक विचार
त्यांनी पेन तोंडात धरून लेखन करायला सुरुवात केली. पुढे संगणक आला आणि तोंडात लाकूड धरून संगणकाचा की-बोर्डही त्यांनी हाताळला. की-बोर्ड समोर अडकवत आणि हलक्या लाकडाचा तुकडा तोंडात धरून एक-एक अक्षर टाइप करत. त्यांनी अनेक लेख लिहिले. ते प्रसिद्धही झाले. या लेखांनी त्यांना अनेक मित्र मिळवून दिले. रोज सकाळी आणि संध्याकाळी ते लेखन करीत. त्यांच्या लेखांचे विषय मुख्यत: सनिक, सुरक्षा आणि लढावू विमानांविषयी असत. त्यांचे लेखातून व्यक्त झालेले विचार नवीन सनिकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहेत.