दिल्लीतील सामूहिक बलात्काराला पीडित मुलगीच जबाबदार असल्याचे वादग्रस्त विधान करणा-या आसाराम बापूंनी आता प्रसार माध्यमांवरही आगपाखड केली आहे.
नवी दिल्ली- दिल्लीतील सामूहिक बलात्काराला पीडित मुलगीच जबाबदार असल्याचे वादग्रस्त विधान करणा-या आसाराम बापूंनी आता प्रसार माध्यमांवरही आगपाखड केली आहे. ‘कुत्रे भुंकतच असतात, त्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही,’ अशी टीका त्यांच्या वक्तव्याचे वृत्तांकन करणा-या माध्यमांवर केली आहे.
‘माझ्या विधानावरून सुरू झालेल्या टीका-टिपण्णीला प्रसार माध्यमच जबाबदार आहेत. जेव्हा हत्ती चालत असतो, तेव्हा कुत्रे भुंकतातच. मात्र त्यामुळे हत्तीचे महत्त्व कमी होत नाही. तो कुत्र्यांकडे लक्षही देत नाही,’ असे आसाराम बापू म्हणाले.
[EPSB]
ग्रह फिरल्याने महिलांवर अत्याचार »
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांमध्ये मुक्ताफळे उधळण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. आता छत्तीसगडचे गृहमंत्री नानकीराम कंवर यांनी अकलेचे तारे तोडले…
आसारामची बुद्धी भ्रष्ट झाली: राखी »
आसाराम बापूंच्या वक्तव्याचा देशभरातील जनता निषेध व्यक्त करत असताना आयटम गर्ल राखी सावंतनेही कडक शब्दात टिका केली.…
[/EPSB]