विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील तीनही मतदार संघात शांततेत मतदान झाले. एकही तक्रार अथवा गुन्हा दाखल न होता व कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे मतदान झाले.
सिंधुनगरी – विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील तीनही मतदार संघात शांततेत मतदान झाले. एकही तक्रार अथवा गुन्हा दाखल न होता व कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे मतदान झाले.
जिल्ह्यातील ७ ठिकाणच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने ते बदलून देण्यात आले. सायं.५ वा. पर्यंत जिल्ह्याात ५६.५० एवढे मतदान झाले होते अशी माहिती सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई.रवींद्रन यांनी मतदानानंतर पत्रकार परिषदेत दिली. सायंकाळी ६. वा पर्यंत ६५ टक्के जाईल असा अंदाज आहे.
जिल्ह्यात दुपारी १. वा. पर्यंत कमी मतदान झाले मात्र शहरासह ग्रामीण भागातही सायंकाळच्या सत्रात मतदारांनी मोठी गर्दी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.५० टक्के एवढे मतदान झाले होते. यावेळी जिल्ह्यात कोणत्याही तक्रारी न होता मतदारांना शांततेत व सुरळीतपणे मतदानाचा हक्क बजावता आला.
या तीनही मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेने अतिशय चोख व्यवस्था पार पडली. २६८ कणकवलीमध्ये २ लाख २३ हजार ९१० मतदार असून सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ३४ हजार ३९२ मतदारांनी मतदान केले.
मतदानाची सरासरी टक्केवारी ६०.०२ टक्के आहे. २६९ कु डाळमध्ये २ लाख ०४ हजार ८०५ मतदार असून एकूण ५८.१७ टक्के, २७० सावंतवाडी मध्ये २ लाख १९ हजार ०३८ मतदार यापैकी १ लाख १२ हजार संघातील मतदानाची टक्केवारी ६५ टक्के होईल असा अंदाज जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.
कणकवली मतदार संघात बीडयेवाडी व हरकुळ, तर कुडाळ मध्ये खाजणवाडी येथे सावंतवाडी येथे खवणे, झरे, सातार्डा, शिरोडा येथील मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाले होते. त्या ठिकाणी तात्काळ नवीन मतदान यंत्र बदलण्यात आले. कणकवलीमधील बिडवाडी व हरकुळ खुर्द, कुडाळमधील खाजणवाडी व सावंतवाडी मतदार संघातील खवणे व झरे, सातार्डा व शिरोडा येथील मतदान यंत्रे बदलून देण्यात आली. मतदानाच्या दिवशी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई.रवींद्रन बोलत होते.
तीनही मतदार संघाची मतमोजणी १९ रोजी स. ८ वा पासून सुरु होणार आहे. कु डाळची ओरोस येथे तर कणकवली व सावंतवाडीची त्या ठिकाणी मतमोजणी होणार असून आज बुधवारी उशिरापर्यंत सर्व केंद्रावरून मतदान यंत्रे पोलिस बंदोबस्तात दाखल होणार आहेत असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
शिस्त पाळली
जिल्हावासीय जनता सर्वच राजकीय पक्ष तसेच विविध पक्षासह अपक्ष उमेदवारांनी शिस्त पाळली. सर्वानीच प्रशासनाला चांगले सहकार्य दिल्याने मतदारांनाही शांततेत मतदान करता आले. त्याबद्दल जिल्हाधिकारी ई.रवींद्रन व जिल्हा पोलिस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर यांनी सर्वानाच धन्यवाद दिले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत
जिल्हय़ात तीनही मतदार संघात मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडला नसून जिल्ह्यात सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले. मतदानादिवशी सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता अशी माहिती पोलिस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी दिली.