त्यांचा राजीनामा हा भाजपामधील अंतर्गत सुडराजकारणाचा बळी आहे, अशी तीव्र प्रतिक्रीया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पहिला आरोप झाला तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांचा राजीनामा हा भाजपामधील अंतर्गत सुडराजकारणाचा बळी आहे, अशी तीव्र प्रतिक्रीया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
श्री. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे वृत्त आल्यानंतर श्री. नारायण राणे आपली प्रतिक्रीया व्यक्त करत होते. ते म्हणाले की, भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तीन वेळा खडसेंना क्लीनचीट दिली. मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली. दाऊदकडून फोन आले नाहीत, अशी पोलिस खात्याने क्लीनचीट दिली, असे असताना खडसे यांचा राजकारणातील बळी कुणी घेतला? त्यांच्या विरोधातील षडयंत्र कुणी तयार केले? असाही प्रश्न श्री. नारायण राणे यांनी विचारला असून श्री. राणे म्हणाले की, या आरोपांमुळे मंत्रीमंडळातील बहुजन समाजाच्या नेत्यांची मुद्दाम मानहाणी करण्यात आलेली आहे.
कोणतीही चौकशी न करता आणि खडसे यांच्यावरील आरोप सिद्ध न होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेत बहुजन समाजाचा अपमान केला आहे. श्री. नारायण राणे पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी फडणवीस सरकारातील मंत्र्यांवर झालेले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे त्या त्या मंत्र्याला संरक्षण देत होते आणि ‘आरोपात काही तथ्य नाही’ असे सांगत होते. आज मात्र खडसेंच्या बाबतीत चौकशी न करता त्यांनी राजीनामा घेतला आहे.
चौकशी करून खडसेंवरचे आरोप सिद्ध झाले असते, तर राजीनाम्याची कारवाई योग्य होती. भाजपाच्या अन्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. ते भ्रष्टाचारी नाही का? असाही सवाल नारायण राणे यांनी केला. श्री. राणे म्हणाले की, मी खडसे प्रकरणात अगोदरच स्पष्ट केले आहे की, खडसे यांच्यावर पहिला आरोप झाला तेव्हाच त्यांनी राजीनामा देणे योग्य होते. एमआयडीसीच्या मालकीची जमिन खडसे यांच्या नातेवाईकांसाठी घेणे हे गंभीर आणि गैर आहेच. काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराचे कधीही समर्थन केले नाही म्हणून युपीए सरकारातील सुरेश कलमाडी, ए.राजा, श्रीमती कळमोली यांच्यावर थेट कारवाई करून त्यांना तुरुंगात जावे लागले. केंद्रीय रेल्वे मंत्री पवन बन्सल यांच्या भाच्याने पैसे घेतल्याचा आरोप झाला तेव्हा रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतला होता. भ्रष्टाचाराचे समर्थन काँग्रेसने कधी केले नाही आणि करणारही नाही, असे श्री. राणे यांनी सांगितले.
[EPSB]
खडसेंची विकेट गेली?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूलमंत्री खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ठेवला असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर खडसे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी कधीही जाहीर होऊ शकते.
एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा
अनेक वादात सापडलेले महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे.
[/EPSB]