जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मध्यान्न भोजनातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ३० मुलांना विषबाधा झाली.
पुणे – जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मध्यान्न भोजनातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ३० मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या मुलांना जुलाब, उलटय़ा सुरु झाल्याने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बल्लाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना शिरा देण्यात आला होता. शिरा खाल्ल्यानंतर काही वेळातंच विद्यार्थ्यांना जुलाब-उलटयांचा त्रास होऊ लागला.
शिक्षकांनी तातडीने या विद्यार्थ्यांना जुन्नरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.