पोटच्या तीन मुलींना भीमा नदीच्या पात्रात ढकलून देऊन २६ वर्षीय महिलेने स्वत: पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता दौंड शहरात घडली.
पुणे- पोटच्या तीन मुलींना भीमा नदीच्या पात्रात ढकलून देऊन २६ वर्षीय महिलेने स्वत: पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता दौंड शहरात घडली.
अफरीन महीनुद्दीन शेख (रा. खाटीक गल्ली, दौंड) या विवाहितेने आर्शिदा महीनुद्दीन शेख (६), आसमा महीनुद्दीन शेख (४), रुतमीन महीनुद्दीन शेख (दीड वष्रे) या मुलींना पहाटे चार वाजता घोडेपीरबाबा दर्ग्याजवळील २८ नं. रेल्वे पुलावरून भीमा नदीच्या पात्रात ढकलून देऊन स्वत:ही उडी घेऊन आत्महत्या केली.
तिने आधी आपल्या मुलींना पाण्यात ढकलून दिले. हे पाहून तिची मोठी मुलगी तसकीन ऊर्फ लाली (८) ही घाबरून घरी पळून गेली. चार महिन्यांपूर्वीच आफरीन माहेरी दौंड येथे आली होती. तिचा पती ट्रक ड्रायव्हर असून, तो १५ दिवसांपूर्वी तिला भेटावयास आला होता. मृत आफरीनचा पती सध्या बंगलोरला आहे, आफरीनच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.