त्रिपुरा सरकारने लष्कराला विशेष अधिकार देणारा सशस्त्र दल विशेष संरक्षण कायदा (अफ्सा) अखेर १८ वर्षानी रद्द केला आहे.
आगरतळा- त्रिपुरा सरकारने लष्कराला विशेष अधिकार देणारा सशस्त्र दल विशेष संरक्षण कायदा (अफ्सा) अखेर १८ वर्षानी रद्द केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी मंत्रिमंडळातील सहका-यांशी चर्चा केल्यानंतर हा कायदा रद्द करण्याची घोषणा केली.
त्रिपुरामधील परिस्थिती आता बदलली असून, राज्यातील हिंसाचार कमी झाल्याने त्रिपुरा सरकारने हा निर्णय घेतला. फेब्रुवारी १९९७ पासून राज्यात हा कायदा अस्तित्वात होता. डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी हा कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना मंजुरी मिळाली नव्हती.
मात्र आता परिस्थिती मोठय़ा प्रमाणावर बदलली असून त्यामुळेच हा कायदा रद्द केल्याचे मुख्यमंत्री सरकार यांनी सांगितले.