जम्मू-काश्मीरमधील पुरपरस्थितीचा फायदा घेऊन सुमारे २०० दहशतवादी नियंत्रण रेषेवरुन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शनिवारी लष्कराने दिली.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुरपरस्थितीचा फायदा घेऊन सुमारे २०० दहशतवादी नियंत्रण रेषेवरुन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शनिवारी लष्कराने दिली.
काश्मीर खो-यात नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्यासाठी सुमारे २०० दहशतवादी तयारीत असल्याचे लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा यांनी सांगितले. हे घुसखोर जम्मू-काश्मीरमधील पुरपरस्थितीचा फायदा घेऊन या भागात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लष्कराचे जवान त्यांचे प्रयत्न हाणून पाडत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुराचा मोठा फटका लष्कराच्या छावणीला बसला होता. छावणीचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला होता. मात्र त्या परिस्थितीतही कडक सुरक्षा तैनात होती, असे साहा यावेळी म्हणाले. गेल्या दहा दिवसांत घुसखोरांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे हे प्रयत्न विफल ठरले. याकारवाईत पाच घुसखोरही ठार झाले. तीन घुसखोरांना केरन सेक्टर भागात तर दोन जणांना माचिल भागात ठार करण्यात आल्याची माहिती साहा यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये सुमारे २८० लोकांचा मृत्यू झाला. तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.