आयपीएलच्या मागील म्हणजे आठव्या (२०१५) आवृत्तीतून एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) जवळपास ११५० कोटींचे योगदान राहिले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले.
नवी दिल्ली – आयपीएलच्या मागील म्हणजे आठव्या (२०१५) आवृत्तीतून एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) जवळपास ११५० कोटींचे योगदान राहिले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले.
भारताच्या अर्थव्यवस्थेत आयपीएलचा किती प्रभाव आहे, याबाबत बीसीसीआय नियुक्त केपीएमजी स्पोर्ट्स अॅडव्हायझरी ग्रुपने केलेल्या सर्वक्षणातून वरील माहिती उघड झाली आहे. मागील सात हंगामांप्रमाणे आठवी आवृत्तीही आठ संघांत झाली. भारतातील १२ वेगवेगळय़ा शहरांत ४४ दिवसांत तब्बल ६० सामने रंगले.
त्यात भारतासह जगभरातील १९३ क्रिकेटपटू खेळले. जगभरात १७ लाखाहून अधिक लोकांनी आयपीएलचा आनंद लुटला. त्यात भारतासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील चाहत्यांचाही समावेश आहे. आधीच्या सात हंगामांच्या तुलनेत आठव्या हंगामात प्रेक्षकसंख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली.
‘प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न’
अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिल्याचे भासवत फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणातून खालावलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न बोर्ड करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.