मुरूडच्या समुद्रकिना-यावर सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सरकार जागे झाले असून धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नये, असे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये २७ नियमावली बनवण्यात आली असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून या नियमावलींची अंमलबजावणी होईल असे वाटते का? पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी बनवलेल्या या नियमावलींची अंमलबजावणी राज्याच्या सर्व शहरांमध्ये व्हायला हवी का? परिपत्रकातील नियमावली योग्य वाटते का? या नियमावलीमुळे सहलीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असणा-या आनंदावर विरजण पडेल असे वाटते का? नियमावली न पाळणा-या शाळांविरोधात काय कारवाई करायला हवी? धोक्याच्या ठिकाणी सहली घेऊन जाऊ नये याबाबत पालकांनी काय भूमिका घ्यावी?
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
प्रहार कार्यालय,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-६१२३९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत करा www.prahaar.in