काठमांडूच्या ख-या सौदर्याची पर्यटकांना अनुभूती देणारा ऐतिहासिक धरहरा टॉवर शनिवारी शेकडो पर्यटकांसाठी दफनभूमी ठरला.
काठमांडू – काठमांडूच्या ख-या सौदर्याची पर्यटकांना अनुभूती देणारा ऐतिहासिक धरहरा टॉवर शनिवारी शेकडो पर्यटकांसाठी दफनभूमी ठरला. तीव्र भूकंपाच्या धक्क्यामध्ये धरहरा टॉवर क्षणार्धात जमीनदोस्त झाला.
या टॉवरच्या ढिगा-याखालून आतापर्यंत १८० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही अनेक जण ढिगा-याखाली अडकले आहेत. ५०.५ मीटर उंचीच्या नऊ मजली टॉवरचा आता फक्त तळ शिल्लक उरला आहे.
धरहराच्या शिखरावरुन काठमांडूचे अस्सल सौदर्य डोळयात साठवता येत असल्याने हा टॉवर पर्यटकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू होता. नेपाळची राजधानी काठमांडू शहराच्या मध्यभागी असलेला हा टॉवर १८३२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांनी बांधला होता.