काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे पंतप्रधान मनमोहन सिंग भारतात परतल्यानंतर विचारात घेणार आहेत.
नवी दिल्ली – दोषी लोकप्रतिनिधींच्या अध्यादेशावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे पंतप्रधान मनमोहन सिंग भारतात परतल्यानंतर विचारात घेणार आहेत. त्यामुळे आता हा अध्यादेश सरकारकडून मागे घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे.
वॉशिंग्टन येथून प्रसिध्दीपत्रकाव्दारे सिंग यांनी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेसाठी मनमोहन सिंग अमेरिकेला गेले आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन हे विधेयक कच-याच फेकून देण्याचे मत व्यक्त केले होते.
काँग्रेस उपाध्यक्षांनी या विषयावर पत्र लिहून त्यांचे मत मला कळवले आहे. भारतात परतल्यानंतर मंत्रिमंडळाशी चर्चा करुन, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे निश्चित विचारात घेऊ असे सिंग यांनी सांगितले.