आपल्यासमोर खडतर आव्हाने आहेत. मात्र, तरीही न डगमगता काँग्रेस कार्यकर्त्यांनी येणा-या संकटांना सामोरे जायला हवे.
चिपळूण- आपल्यासमोर खडतर आव्हाने आहेत. मात्र, तरीही न डगमगता काँग्रेस कार्यकर्त्यांनी येणा-या संकटांना सामोरे जायला हवे. भविष्यातील निवडणुका मोबाईल व सोशल मीडियामुळे जिंकता येणार नाहीत.
त्यासाठी तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवा. जनतेची कामे करा तरच यश आवाक्यात येईल, असे मार्गदर्शन माजी खासदार निलेश राणे यांनी केले. जिल्ह्यात पक्ष संघटनेत लवकरच बदल होणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी सायंकाळी निलेश राणे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, प्रभाकर जाधव, नगरसेवक कबीर काद्री, मंगेश शिंदे, वैभव वीरकर, प्रफुल्ल पिसे, संदेश भालेकर, गौतम रेडीज, फैसल पिलपिले, अश्विनी भुस्कुटे, रसिका काजारी, प्रीतम इंगवले व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी निलेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश आले. पण जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हताश होऊ नये.
जोमाने पक्षवाढीला सुरुवात करावी. खडतर आव्हाने आली तरी डगमगून जाऊ नये. लोकांपर्यंत संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करा. गप्प राहून पक्षसंघटना वाढणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असेही निलेश राणे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.