यपीएलच्या ‘फायनल’मध्ये आजवर सात संघांनी धावांच्या फरकाने विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे.
दहाव्या हंगामातील मुंबईचा पुण्यावरील विजय हा आयपीएलच्या अंतिम फेरीतील धावांच्या फरकाने मिळवलेला सर्वात निसटता विजय ठरला.
आयपीएलच्या ‘फायनल’मध्ये आजवर सात संघांनी धावांच्या फरकाने विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे. त्यात माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज आघाडीवर आहेत. त्यांनी २०११मध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सला ५८ धावांनी हरवले होते. यावेळच्या अंतिम लढतीसह २००९ आणि २०१६ मधील विजयही निसटते होते. त्यावेळी डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादने अनुक्रमे ६ आणि ८ धावांनी प्रतिस्पध्र्याना हरवले. विकेटच्या फरकाने सर्वात निसटत्या विजयाची नोंद २००८ आणि २०१४मध्ये झाली. त्यावेळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनी आपापल्या प्रतिस्पध्र्याना प्रत्येकी तीन विकेट राखून हरवले.