भारत-बांगलादेश ऐतिहासिक सीमा करार झाल्यानंतर दोन्ही देशांनी १६२ गावांचे अंतिम आदान प्रदान शुक्रवारी पूर्ण केले. गेल्या सात दशकांपासून विवादात अडकलेला हा सीमाप्रश्न सुटला.
ढाका – भारत-बांगलादेश ऐतिहासिक सीमा करार झाल्यानंतर दोन्ही देशांनी १६२ गावांचे अंतिम आदान प्रदान शुक्रवारी पूर्ण केले. गेल्या सात दशकांपासून विवादात अडकलेला हा सीमाप्रश्न सुटला.
भारतातील १११ गावे १७१६० एकर जमीन बांगलादेशला दिली तर बांगलादेशच्या ताब्यातील ५१ गावे ७११० एकर जमीन भारताकडे आली. आता दोन्ही देशांतील सीमा सरळ व सोपी झाली आहे.
बांगलादेशातील भारतीय गावांमध्ये ३७ हजार जण राहत होते तर भारताच्या हद्दीतील बांगलादेशी गावांमध्ये १४ हजार जण होते. आता या गावात राहणा-या नागरिकांना संबंधित देशांचे नागरिकत्व मिळणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. भारत व बांगलादेशातील अधिका-यांनी ६ ते १६ जुलैदरम्यान ७५ पथकांनी हे काम पूर्ण केले. दोन्ही देशांचे ३० निरीक्षक यात सहभागी झाले होते.