महिला या आज पुरुषांच्या बरोबरीने अनेक आघाडयांवर काम करणा-या प्रभावी घटक आहेत. कन्या, पत्नी आणि माता म्हणून तिची भूमिका वादातीत आहे. समाजाच्या अनेक क्षेत्रांत कित्येक महिलांनी चाकोरीबाहेर जात पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. पण…
महिला या आज पुरुषांच्या बरोबरीने अनेक आघाडयांवर काम करणा-या प्रभावी घटक आहेत. कन्या, पत्नी आणि माता म्हणून तिची भूमिका वादातीत आहे. समाजाच्या अनेक क्षेत्रांत कित्येक महिलांनी चाकोरीबाहेर जात पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. पण अजूनही महिलांना सर्व क्षेत्रांत बरोबरीचे स्थान देण्यात पुरुष आखडता हात घेतात. विशेषत: आर्थिक आणि औद्योगिक आघाडीवर महिलांना स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासही पुरेसा वाव दिला जात नाही. शहरी भागातही महिलांनी नोकरीत दुस-या किंवा तिस-या फळीवर काम करावे, अशी परिस्थिती आहे. मग ग्रामीण भागात महिलांची कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर काय स्थिती वा स्थान असेल याची कल्पना केलेली बरी. अशा या महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी योजनाबद्ध व ठोस पावले टाकणे जरूरीचे होते. महिलांच्या सक्षमीकरणाची ही गरज ओळखून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने खास महिलासाठी आर्थिक क्षेत्राची नवी आव्हानात्मक दालने खुली करण्याचे ठरवले आहे. याच धोरणाला अनुसरून गेल्या वर्षी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्प मांडताना महिला बँक स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूदही केली. हे सरकार केवळ मोठया घोषणा करत नाही, तर त्यांना मूर्तस्वरूपही देते हे मंगळवारी मुंबईत स्थापन झालेल्या देशातील पहिल्या महिला बँकेच्या उद्घाटनाने सिद्ध झाले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या महिला बँकेचे मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित होत्या. महिला बँकेची ही योजना म्हणजे यूपीए सरकारने या देशातील तमाम महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आíथक ऊर्जतिावस्थेसाठी उचललेले एक दमदार पाऊल आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रातील महिलांचे स्थान उंचावण्याचा सरकारचा निर्धार असून महिला बँक हे या निर्धाराचे द्योतक म्हणावे लागेल. यामुळेच मुंबईत महिला बँकेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, या बँकेची सुरुवात म्हणजे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राजकारणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली. राजकारणाप्रमाणे महिलांचे आíथकदृष्टयाही सक्षमीकरण होणे जरूरीचे आहे. सोनिया गांधीही या वेळी बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत, हे इंदिरा गांधी यांचे स्वप्न होते. या बँकेचा प्रारंभ ही त्यांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. महिला बँकेची ही योजना खरोखर क्रांतिकारक आहे. महिलांनी महिलांसाठी चालवल्या जाणा-या या बँकांचा फायदा देशातील सर्वच स्तरातील महिलांना मिळणार आहे. या बँकांचा फायदा बचत गटांना तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल व मागासवर्गीय महिलांना होणार आहे. विशेष म्हणजे या बँकांचे जाळे सा-या देशभर पसणार असून मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूरु या मोठया शहरांमध्ये या बँकेच्या प्राथमिक स्तरावर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्च २०१४पर्यंत या शाखांची संख्या पंचवीसवर नेण्यात येणार आहे. २०२०पर्यंत बँकेच्या ७७० शाखा सुरू झालेल्या असतील. तसेच पुढील सात वर्षात ठेवी व कर्जे मिळून ६० हजार कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या क्रांतिकारी योजनेचा दिमाखदार आणि दमदार सोहळा महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत व्हावा, ही मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या महानगरात महिला उद्योजकांचे लहान-मोठे उद्योग, व्यवसाय, एजन्सीज असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली होत असतात. यामुळे महिला बँकेला महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू शकेल. या बँकेच्या मुंबई शाखेच्या व्यवस्थापक म्हणून एका मराठी महिलेची नियुक्ती झाली आहे, हीसुद्धा मराठी महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. आता या बँकेला महिलांचा व महिलांनी चालवलेल्या संस्थांचा उदंड प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी बँक व्यवस्थापनाने या संस्थांशी संपर्क साधला पाहिजे. पहिल्याच दिवशी या बँकेत ५५ खाती उघडण्यात आली, यावरून या बँकेचे भविष्य किती उज्ज्वल आहे, हे समजते. महिला बँकेमुळे लघुउद्योग करणा-या महिलांना पतपुरवठ्यासाठी मोठाच आधार मिळणार आहे, ही या महिलांच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. खानावळ चालवून कॅटरिंगचा व्यवसाय करणा-या, पाळणाघर चालवणा-या, शिवणकाम करणा-या, घरगुती व्यवसाय करणा-या अशा अनेक श्रमजीवी महिलांना या बँकेचा फायदा होऊ शकेल तसेच नोकरदार महिलांना घरातील सोयीसुविधांसाठी बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या बँकेची अनेक वैशिष्टये आहेत. ही बँक महिलांसाठी कुठलेही तारण न घेता कर्ज उपलब्ध करू शकेल तसेच इतर बँकांपेक्षा अधिक व्याज व कमी व्याजदरात कर्ज देईल. या बँकेचा लाभ गरजू महिलांना होईल. त्याबरोबरच या बँकेमुळे बँकेचे व्यवहार माहीत नसलेला महिलांचा फार मोठा वर्ग बँकेचे व्यवहार करू लागेल. शिक्षणाचा प्रसार, नोकरी, व्यवसाय, विविध निमित्ताने आíथक उलाढाली यामुळे गेल्या तीन दशकात फार मोठ्या संख्येने महिला बँकेचे व्यवहार करू लागल्या आहेत. परंतु त्याचबरोबर बँक व्यवहारांची काहीही माहिती नसणारा व बँकेशी संबंध नसलेला महिलांचा फार मोठा वर्ग देशात आहे. देशातील फक्त २६ टक्के महिलांचे बँकेत खाते आहे. अर्थात देशातील २६ टक्के महिलांचे बँकखाते असले तरी कर्ज घेणा-या महिलांचे प्रमाण फार कमी म्हणजे केवळ ७.३ टक्के आहे. अर्थात महिलांची ही बँक खाती आणि कर्जाच्या लाभार्थी यांचा विचार करता ही स्थिती शहरांपुरतीच प्रामुख्याने मर्यादित आहे. म्हणजे सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या वरच्या थरातील थोड्या महिलाच कर्जाचा लाभ घेऊ शकतात. आज खेड्यापाड्यात जरी बँका पोहोचल्या तरी ग्राहक शिक्षित आणि नोकरदार महिलाच आहेत. श्रमिक खेडुत महिला, आदिवासी महिला यांचा बँकांशी संबंध येतच नाही. आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील महिलांना बँक व्यवहारांची ओळख करून देऊन त्याची सांगड ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांच्या व्यवसायांशी घालून देणे, हे भविष्यात महिला बँकांचे काम राहणार आहे. ही समज बँक चालकांनाही असायला हवी. हे करताना या बँकांना प्रारंभी फायद्यातोट्याची तागडी लावून विचार करता येणार नाही, हे बँकांच्या महिला अधिका-यांनी आणि सरकारनेही ओळखले पाहिजे. या देशातील बडया उद्योगपतींनी, उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी बँकांची एक लाख कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत, हे वास्तव लक्षात घेता ग्रामीण व आदिवासी भागातील गरीब महिलांना मदत करताना हात आखडता घेता कामा नये. महिला बँकेची मुहूर्तमेढ आता रोवली गेली आहे, तिची पायाभरणीही भरभक्कम झाली आहे. यातूनच पुढे महिला आर्थिक सक्षमीकरणाची गगनचुंबी इमारत उभारली जाणार आहे.
[EPSB]
शालेय प्रवास अधिक सुरक्षित
शाळेत जाणा-या छोटया मुलांची सुरक्षित वाहतूक हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. ही वाहतूक अधिकाधिक सुरक्षित कशी करता येईल, याबाबत गेले काही दिवस बरीच चर्चा व ऊहापोह चालला आहे. शाळांतील मुलांची ने-आण करण्याचे काम शाळा व्यवस्थापनाने नेमलेल्या कंत्राटी वाहतूकदारांकडून होत असते.
[/EPSB]