राज्यात स्वाईन फ्लूचे १८ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या १८६वर गेली आहे.
मुंबई – राज्यात स्वाईन फ्लूचे १८ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या १८६वर गेली आहे. रविवारी या आजाराने चौघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या आजारामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २३वरून ३०वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात स्वाईन फ्लूचे ३३ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १६८ झाली होती. त्यात ३४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यापैकी २ रुग्ण मध्य प्रदेशातील, एक रुग्ण आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत ७०हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूरमध्ये असून ५३ रुग्णांचे पुण्यातील आहेत. मुंबईत २९ रुग्ण आहेत.
जिल्हा आणि पालिकेच्या रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण रुग्णालयात तिघांचा याच आजाराने मृत्यू झाला. सातारा, औरंगाबाद, जळगाव, जालना, लातूर, गोंदिया, ठाणे, खारघर, पालघर अहमदनगर येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागपूर महानगरपालिका रुग्णालयात ८, नागपूर ग्रामीण रुग्णालयात ३ आणि अन्य राज्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे.