वसुंधराराजे यांनी ललित मोदी यांना ‘पद्मश्री’ देण्याची शिफारस त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून केली होती. मनमोहन सिंग यांनी ती शिफारस अमान्य केली. ललित मोदीला पद्मश्री देण्याचे नाकारले. उलट या देशातून हद्दपार केले. वसुंधरा राजेंचे शिफारसपत्र?उघड झाल्यानंतर संसदेत हंगामा झाला.?
व्यापम घोटाळ्यात ४८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला.
मोदी बोलत नाहीत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचा ४० हजार कोटींचा तांदूळ घोटाळा उघड झाला.
मोदी बोलत नाहीत.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या सरकारचे फरार घोषित केलेल्या ललित मोदी यांच्याशी आर्थिक संबंध आहेत, हे पुराव्यानिशी उघड झाले.
मोदी बोलत नाहीत.
धोलपूर शासनाच्या ताब्यातील राजमहाल वसुंधराराजे आणि ललित मोदी यांनी भागीमध्ये हडप केला.
मोदी बोलत नाहीत.
वसुंधराराजे यांनी ललित मोदी यांना ‘पद्मश्री’ देण्याची शिफारस त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून केली होती. मनमोहन सिंग यांनी ती शिफारस अमान्य केली. ललित मोदीला पद्मश्री देण्याचे नाकारले. उलट या देशातून हद्दपार केले. वसुंधरा राजेंचे शिफारसपत्र?उघड झाल्यानंतर संसदेत हंगामा झाला.?
मोदी बोलत नाहीत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे व्यापम घोटाळय़ात अडकले आहेत. त्यांच्याच काळात व्यापम घोटाळा सुरू झाला. ‘सीबीआय’कडे चौकशी द्यायला शिवराजसिंह चौहान यांचा विरोध होता. खूप मोठय़ा दबावानंतर अलीकडे चौकशी ‘सीबीआय’कडे द्यावी लागली. त्यामुळे शिवराजसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे सुरू झाली. संसदेत हंगामा झाला.
मोदी बोलत नाहीत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फरार घोषित झालेल्या ललित मोदी याला व्हिसा देण्यासाठी बेकायदेशीररित्या मदत करून मंत्रीपदाचा दबाव आणून ललित मोदीचा व्हिसा मंजूर करून दिला. ज्याला सरकारने फरार घोषित केले आहे, त्याचा व्हिसा द्यायला मदत करणारे परराष्ट्रमंत्री आहेत. ही गोष्ट उघड झाल्यानंतर लोकसभा अधिवेशन सुरू?होताना विरोधी पक्षाने मोदी, स्वराज यांचे हे प्रकरण उघड केले. सुषमाबाई म्हणाल्या, ‘मी निवेदन करायला तयार आहे.’ पण संसदेचा नियम असा आहे की, एखाद्या मंत्र्याला आरोपाबद्दल निवेदन करायचे असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्याला निवेदन करण्याचा अधिकार आहे. चिंतामणराव देशमुखांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नंतर निवेदन केले होते. त्या आधी टी. कृष्णमाचारी यांनी मुंदडा प्रकरणात अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मग निवेदन केले. रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देऊन मग आपले निवेदन केले.
आरोप झालेल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो आणि मग त्याला निवेदन करता येते. सुषमाबाई आधी निवेदन करायला निघाल्या. त्यामुळे लोकसभेत हंगामा झाला. राज्यसभेत हंगामा झाला. ‘आधी राजीनामा, मग निवेदन’ ही मागणी विरोधकांनी लावून धरली. दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद करावे लागले. सभागृहाचा नेता पंतप्रधान असतो.
मोदी बोलत नाहीत.
संसद सुरू झाल्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि तीन राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यावर थेट आरोप झाले. त्याचे पुरावे दिले गेले. पंतप्रधान मोदी सभागृहात बसलेले आहेत. आरोप ऐकत आहेत. पण..
मोदी बोलत नाहीत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे एकदम सोवळे नेसलेले मुख्यमंत्री वाटत होते; पण त्यांचा ४० हजार कोटींचा तांदूळ घोटाळा उघड झाला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली.
मोदी बोलत नाहीत.
महाराष्ट्रातले भाजपाचे आमदार आणि भाजपाचे माजी मंत्री यांनी एक रहस्य उघड केले. मंगलप्रभात लोढा नावाचा जो कुणी बिल्डर आहे, तो लोढा पैसे देऊन कामे करून घेतो आणि त्या लोढाला ‘उप्परवाले को पैसा देना पडता है’ यातला ‘उप्परवाला’ कोण याची मागणी झाली. नाव सांगा..
मोदी बोलत नाहीत.
मोदी पंतप्रधान झाल्याला आता १४ महिने झाले. या १४ महिन्यांत मोदींनी हातात झाडू घेऊन गाव-गल्ली झाडायला सुरुवात केली. त्यांच्या मतदारसंघातील गंगामय्या गलिच्छ झाली आहे. ती साफ करायची घोषणा केली. म्हणजे रस्ते साफ झाले पाहिजेत. नदीचे पाणी स्वच्छ झाले पाहिजे; पण त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुद्धा हातात झाडू न घेतलेला हा माणूस म्हणजे मोदी..
मोदी बोलत नाहीत.
‘ना खाऊंगा, ना खाने दूँगा’
लोकसभा निवडणूक प्रचारातील मोदींची ही भाषणे होती. ‘मी भ्रष्टाचार करणार नाही, पैसे खाणार नाही. कुणाला खाऊ देणार नाही’, या वाक्याला मोदी टाळय़ा घेत होते. पंतप्रधान झाल्यानंतर ११ लाख रुपये किमतीचा कोट घालून गरीब देशातला हा पंतप्रधान देशातल्या लोकांसमोर मिजाशीत मिरवू लागला. अवघ्या १० महिन्यांत ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’चा बुडबुडा फुटला. तिकडे दिल्लीतही फुटला आणि इकडे महाराष्ट्रातही फुटला.
मोदी बोलत नाहीत.
मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील क्रीडामंत्री सुरेश कलमाडी यांच्यावर कॅगच्या अहवालात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मनमोहन सिंग यांनी कलमाडी यांचा राजीनामा घेतला. खटला दाखल झाला. त्यांना शिक्षा झाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडींना काँग्रेसने तिकीट दिले नाही. कारण ‘कॅग’ने ठपका ठेवला होता. आता मोदींचे खास उजवे हात नितीन गडकरी यांच्यावर आठ कोटी रुपयाला फसवल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला. पण..
मोदी बोलत नाहीत.