मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
नवी दिल्ली- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. एकूण अकरा आरोपींच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनला टाडा न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर इतर १० जणांच्या फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दाऊद आणि टायगर मेमन यांनी या घटनेला मूर्त स्वरुप देताना याकूब मेमनचा वापर धनुष्यासारखा तर इतर १० जणांचा वापर बाणासारखा केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
… ‘तो’ भीषण दिवस
दुस-या महायुध्दानंतर सर्वाधिक आरडीएक्सचा वापर
या दहा जणांनी मुंबईतील बारा ठिकाणी बॉम्बने भरलेली गाडी ठेवली होती. त्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दहशतवाद्यांना ट्रेनिंग आणि शस्त्रास्त्र पुरवल्यामुळे न्यायालयाने पाकिस्तानला याप्रकरणी सुनावणीमध्ये अनेकवेळा दोषी ठरवले आहे. पाकिस्तानमधील आयएसआय संघटनेचा यात महत्वाचा हात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अभिनेता संजय दत्त याला बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजयने याआधीच १८ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता त्याला साडे तीन वर्षांसाठी तुरुंगात जावे लागणार आहे.
एवढेच नाही, तर देशात येणा-या शस्त्रास्त्रांची तपासणी करण्यात मुंबई पोलिस, कस्टम विभाग आणि कोस्ट गार्ड यांना अपयश आले. त्यामुळे १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात दहशतवाद्यांना यश आल्यामुळे न्यायालयाने देशांतर्गत सुरक्षा यंत्रणांनाही यात जबाबदार धरले आहे.
दरम्यान, २००७ मध्ये टाडा न्यायालयाने या प्रकरणी १०० जणांन दोषी ठरवले होते. तर २३ जणांची सुटका केली होती. १२ जणांना फाशी, २० जणांना जन्मठेप आणि ६८ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झवेरी बाजार, माहिम कॉजवे, मुंबई शेअऱ बाजार, दादर येथील प्लाझा सिनेमा, सेंच्यूरी बाजार, हॉटेल सी रॉक, सहार विमानतळ, एअर इंडिया इमारत, हॉटेल जूहू सेंटॉर, सेनाभवन या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यात २५७ लोकांचा मृत्यू तर ७१३ जणं गंभीर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात अंदाजे २६७ कोटी मालमत्तेचे नुकसान झाले.
याकूब मेमनला फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. – उज्ज्वल निकम, सरकारी वकिल
संजय दत्तने आपल्यावरील निकाल मान्य केला असून सर्व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी तो खंबीर आहे – सतीश मानेशिंदे, संजय दत्तचे वकिल
कोण आहे याकूब मेमन
याकूब मेमन हा टायगर मेमनचा लहान भाऊ असून मुंबई १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. मेमन कुटुंबातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. टायगरच्या सर्व अवैध आर्थिक व्यवहार आणि कारवायांच्या पाठीमागे त्याचा हात आहे. त्यात टायगरच्या अवैध स्मगलिंगचाही समावेश आहे. याकूबने विविध गुन्ह्यांतर्गत याआधी १५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे तुरुंगवास भोगला आहे. मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा न्यायालयाचे न्यायाधीश डी.के.कोदे यांनी २७ जुलै २००७ ला याकूबला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याकूबवर हल्ल्याचा कट रचणे, हल्ला करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे यांसह विविध गुन्ह्यांतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याकूब मेमन फरार आहे.
[EPSB]
संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा »
मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
… ‘तो’ भीषण दिवस
नेहमी घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबापूरी ‘त्या’दिवशी खिन्न झाली. १२ मार्च १९९३ च्या दिवशी दुपारी दीड ते साडेतीन या दोन तासांच्या कालावधीत विविध १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबईसह संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या बॉम्बस्फोटाची मालिका कशी होती, त्याबद्दल…
टाडा न्यायालयातील घटनाक्रम
मुंबईतील १९९३ मध्ये १२ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या सुनावणीमध्ये टाडा न्यायालयाची भूमिका महत्वाची होती. या न्यायालयात १९९३ ते २००६ या काळात महत्वपूर्ण निकाल घेण्यात आले. टाडा न्यायालयात घेण्यात आलेल्या निर्णयांचा घटनाक्रम पुढील प्रमाणे –
[/EPSB]