पुणे – वाढते ताणतणाव, बैठे काम, वेळीअवेळी जेवण अशा आधुनिक जीवनशैलीचा फटका पुणेकरांना बसला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात लठ्ठपणामध्ये राज्यात पुणेकरांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणेकरांपाठोपाठ मुंबईकरांनी दुसरे स्थान मिळवले आहे. पुरुषांसमवेत महिलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सव्र्हेक्षणाच्या (एनएफएचएस-४) चौथ्या टप्प्याच्या निष्कषार्तून ही माहिती पुढे आली आहे.
पुण्यासह मुंबईकरांचे जीवन म्हणजे धावपळ, धकाधकीचे बनले आहे. त्यामुळे वाढता ताणतणाव, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे आता पुण्या-मुंबईसारख्या महानगरांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी वारंवार नोंदविले आहेत. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, प्रचंड गळेकापू स्पधेर्चा तणाव आणि सातत्याने बैठे काम करण्याची लागलेली सवय नोकरदारांच्या प्रकृतीवर परिणाम करीत असल्याचे दिसून आले आहे.
पुण्या-मुंबईतील आयटी, बँकर्स, सरकारी कर्मचारी, अधिकारी, काही प्रमाणात डॉक्टरही लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सव्र्हेक्षणातून महिलांसह पुरुषांच्या लठ्ठपणाची निरीक्षणे नोंदविली आहेत. पुरुषांसह महिलांच्या ‘बॉडी मास इंडेक्स’च्या (बीएमआय) प्रमाणापेक्षा पोटासह कंबरेचा घेर वाढत चालला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, यासारख्या शहरांमधून लठ्ठपणा वाढत असल्याचे सव्र्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.
राज्यात १८.५ किलोपेक्षा कमी ‘बीएमआय’ असलेल्या शहरी महिलांचे प्रमाण १६.८ टक्के तर, ग्रामीण महिलांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत गेले आहे. याच गटात शहरी पुरुषांचे प्रमाण १४.५ टक्के तर महिलांचे प्रमाण २३.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूणच राज्याच्या शहरी भागात राहणा-या महिलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा दुप्पट असल्याचे आढळले आहे. शहरी भागातील महिलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण ३२.४ टक्के, तर ग्रामीण भागातील १४.६ टक्के महिला लठ्ठ आहेत. लठ्ठ पुरुषांचे प्रमाण ३१.२ टक्के असून, ग्रामीण भागात लठ्ठ पुरुषांचे प्रमाण १६.४ आहे.