Saturday, May 18, 2024
Google search engine
Homeमनोरंजनमनोरंजन

मनोरंजन

समाज म्हटला की त्यात विविध श्रद्धांचे व अंधश्रद्धांचे प्रवाह वाहत असतातच. अशाच प्रकारची एक प्रथा कोकणात आढळून येत ती म्हणजे छबिना. असं म्हणतात की पौर्णिमा व अमावस्येच्या रात्री निर्जन भागात हा भुतांचा छबिना निघत असतो.

CHIRANJIVअंधश्रद्धेची कथा ‘चिरंजीव’

समाज म्हटला की त्यात विविध श्रद्धांचे व अंधश्रद्धांचे प्रवाह वाहत असतातच. अशाच प्रकारची एक प्रथा कोकणात आढळून येत ती म्हणजे छबिना. असं म्हणतात की पौर्णिमा व अमावस्येच्या रात्री निर्जन भागात हा भुतांचा छबिना निघत असतो. जर एखाद्या माणसाने हा छबिना पाहिला तर तो अगदी ठार वेडा होतो. अर्थात ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे. काही ठिकाणी तर एखाद्याला घराण्याला शाप आहे अशीही वंदता असते. अशाच प्रकारच्या एका घराची, एका कुटुंबाची कथा असलेला चिरंजीव हा चित्रपट येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे या चित्रपटातली प्रमुख भूमिका भरत जाधव करत आहे.

प्रकाश मोरे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मल्याळम चित्रपट निर्माते आर अय्यर यांनी केली आहे. याविषयी बोलताना रमेश मोरे म्हणाले की, ‘एका मल्याळम चित्रपटाची कथा घेऊन निर्माते रामदास मेनन माझ्याकडे आले. त्यांनी मला एक डीव्हीडी दिला होता. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना सांगितलं की, या चित्रपटात मला कोकण दिसत आहे. त्यामुळे मूळ चित्रपटाचा रिमेक न करता हा चित्रपट अगदी वेगळय़ा कथानकावर व पटकथेवर करावा. त्याप्रमाणे त्यांनी मला परवानगी दिली व आम्ही कामाला सुरुवात केली.

मी स्वत: कोकणातला असल्याने कोकणात कोणकोणत्या अंधश्रद्धा असतात याचा माझा अभ्यास होता. त्यामुळे माझ्या गावाच्या आसपासच्या वातावरणातल्या अशा प्रकारच्या कथानकांचा मी वेध घेतला. त्यातून ही कथा निर्माण झाली. कोणत्याही घरात एक अशी व्यक्ती असते जी सगळय़ांकडून दुर्लक्षित असते. त्याला त्या घरात व परिसरातही पुरेसा मान मिळत नसतो. अशाच एका माणसाची ही कथा आहे. या कथेतल्या मुख्य पात्राला वेड लागलंय अशी आवई उठवण्यात येते. त्यातच त्याच्या कुटुंबाचीही होरपळ होते. त्याचा एक काकाही असाच असतो त्यामुळे या अंधश्रद्धेला अधिकच खतपाणी लागतं.

मात्र मी स्वत: कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मानत नाही. त्यामुळे लोकांच्या मनातले काही गैरसमज दूर करण्यासाठी या चित्रपटाचा वापर होऊ शकेल, असा विचार माझ्या मनात आला. या चित्रपटातून आम्ही ही अंधश्रद्धा दाखवली असली तरी त्याचा कुठेही पुरस्कार केला नाही. उलट ती चुकीची कशी आहे हेच आम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. हा चित्रपट करणं माझ्यासाठी खरोखरच आव्हान होतं. आमच्या निर्मात्यांनी मात्र माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला व त्यानुसार आम्ही कोकणातल्या पालशेत, गुहागर व इतर ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण केलं.

या चित्रपटातल्या कलाकारांच्या निवडीचंही स्वातंत्र्य आम्हाला होतं. भरत जाधव हा विनोदी अभिनेता म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी त्याच्यामध्ये फार मोठा अभिनेता आहे. त्यालाही ही भूमिका आवडली. त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका केली आहे ती पाहता प्रेक्षकांना खरोखरच एक जबरदस्त असा चित्रपट पाहिल्याचा आनंद सहज मिळू शकतो. या चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही मला अशीच मोलाची साथ दिली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अनिल आठल्ये यांनी केलं आहे. त्यांनी अगदी नव्या तंत्राचा वापर करून या कथेसाठी आवश्यक असलेलं गूढ वातावरण फारच सुरेख रितीने पडद्यावर दाखवलं आहे. हा चित्रपट म्हणजे एका अंधश्रद्धेच्या विरोधातली एक लढाईच आहे.

या चित्रपटात भरत जाधव, अलका कुबल, मिलींद काळे, प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

CHAHATOप्रेमाची भावस्पर्शी कहाणी – ‘चाहतो मी तुला’

रुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून नात्यातील हळुवार क्षणांना रेखाटणारा हा फ्रेश चित्रपट १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शाह यांनी ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाद्वारे प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.

प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या विवेक व विद्याची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटुंबीय समजून घेतात का ? त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. भरत शाह प्रस्तुतकत्रे असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा-पटकथा-लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे.

विशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी. जगन यांचं असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रवींद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मििलद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधव, मितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. १५ जानेवारीला ‘चाहतो मी तुला’ सर्वत्र प्रदíशत होणार आहे.

RAJA-PAGGALBABAरजनीश यांच्या जीवनावरचा चित्रपट

भारतात अनेक पंथ, विचारधारा यांची एक मोठी परंपरा आहे. अशाच प्रकारचा आध्यात्माचा एक वेगळा विचार आचार्य रजनीश यांनी दिला होता. त्यांचे कार्य आजही जगभरात पाहायला मिळते. रजनीश यांच्या जीवनाचा प्रवास दाखवणारा ‘रिबेलियस फ्लॉवर’ हा चित्रपटही येत्या १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन जगदीश भारती यांनी केलं आहे. आपल्या चित्रपटातून रजनीश यांच्या जीवनावर व त्यांच्या तत्त्वज्ञानावर एक वेगळा प्रकाश पडू शकेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

किशन हुडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाला ओशो फाऊंडेशननेही सहाय्य केलं आहे. या चित्रपटाने नुकताच इटलीत भरलेल्या सॅलेंटो चित्रपट महोत्सवात परीक्षकांचे विशेष पारितोषिकही पटकावले आहे हे विशेष. रजनीश यांनी आपले बालपण आपल्या आजोळी मध्य प्रदेशमध्ये व्यतीत केले. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण खास त्याच लोकेशनवर जाऊन करण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या पिढीलाही ओशो यांचे जीवन समजून येईल, असा विश्वासही या चित्रपटाच्या टीमने व्यक् त केला आहे.

BEFORE THE RAINS - ACRYLIC ON CANVAS - ARTIST TAPAS MAITIतापस मैती कलाविष्कार

कलकत्ता येथील तरुण उदयोन्मुख चित्रकार तापस मैती यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. ५ जानेवारीपासून सुरू झाले असून ते रसिकांना दि. ११ जानेवारी, २०१६ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे. चित्रकार तापस मैती यांनी आपल्या चित्रात कॅनव्हासवर अ‍ॅक्रलिक रंग वापरून अनोख्या व वास्तववादी शैलीचा उपयोग करून सप्तरंगी कलाविष्कार साकारला आहे. त्यांनी आपल्या चित्रात वैशिष्टय़पूर्ण शैलीतून कलकत्ता शहरातील नागरी जीवनाची वैशिष्टय़े, त्यांचे राहणीमान व त्यांचे सामाजिक जीवन तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्या शहराची विलोभनीय व मोहक रूपे रेखाटली आहेत.

चित्रकार तापस मैती यांचे कलाशिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट कलकत्ता येथे झाले. त्यांनी काही एकल व सामूहिक कला प्रदर्शनातून आपली चित्रे मांडली असून त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यांना कलाप्रवर्तक संस्थांकडून अनेक पारितोषिके मिळाली असून भारतातील व विदेशातील कित्येक मान्यवर कलासंग्रहाकडे त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे.

चित्रकार तापस मैती यांनी सदर प्रदर्शनात मांडलेल्या चित्रात ब्रशचा उपयोग न करता स्पॅटूला हे तंत्र वापरून कलकत्ता शहराचे सौंदर्य व तिची सांस्कृतिक परंपरा आणि वैभव ह्यांचे कलात्मक दर्शन घडवले आहे. विविध ऋतूंमधील निसर्गातील रम्यता, शहरातील वातावरण व सांस्कृतिक वैभव दाखवत असताना त्यांनी सामान्य जनजीवन व त्यांचे अनेक पैलू दर्शविले आहेत. उत्तम रंगसंगती व तिचा आकर्षक पोत तसेच आवश्यक तो दृश्यपरिणाम दाखविताना साधलेली अचूक संकल्पना व त्यातील रम्यता चित्रकाराने अगदी स्पष्टपणे व कलात्मकतेने सादर केली आहे. तसेच आनंदी भाव व आशावाद आणि उज्वलता ह्याकडे खास लक्ष देऊन चित्रकाराने प्रत्येक चित्रांमधून बोलकेपणा, पारदर्शकता व आशयघनता अगदी सहज मांडली आहे याद्वारे त्यांनी रसिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवत राहतं. या प्रदर्शनाला आतापर्यंत अनेकांनी भेट दिलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट