सीमांध्र व रायलसीमा भागातील वीज कर्मचारी तेलंगणविरोधात बेमुदत संपावर गेल्याने या भागातील हजारो गावे काळोखात गेली आहेत.
नवी दिल्ली- सीमांध्र व रायलसीमा भागातील वीज कर्मचारी तेलंगणविरोधात बेमुदत संपावर गेल्याने या भागातील हजारो गावे काळोखात गेली आहेत. वीज निर्मिती व पुरवठा बंद असल्याने दक्षिण पावर ग्रीड बंद पडला असून अनेक उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे. वीज कर्मचारी संपावर गेल्याने पाण्याचा पुरवठा, रेल्वे, विमानतळ आणि रुग्णालये या अत्यावश्यक सेवांवरही विपरित परिणाम झाला.
श्रीशैलम येथील वीजनिर्मिती प्रकल्प, विजयवाडा, रायलसीमा आणि सिम्हाद्री विद्यूत प्रकल्पात वीजनिर्मिती पूर्णपणे थांबल्याने वीजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वीजेच्या तुटवडय़ामुळे तिरूपती व विजयवाडा येथील विमनातळे जनरेटरवर सुरू आहेत.
आंध्रप्रदेशच्या विभाजनाच्या निर्णयाविरोधात सर्वाधिक हिंसक विरोध प्रदर्शन झालेल्या विजयनगरमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी मंगळवारी सकाळी तासाभरासाठी शिथील करण्यात आली होती. येथील हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. संचारबंदी शिथील केल्यानंतरही पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन होते.
दरम्यान, सीमांध्र आणि रायलसीमा भागातील विद्युत विभागाचे हजारो कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने आंध्रप्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला असून, येथील अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. या वीज संकटाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. या मार्गावरील अनेक प्रवासी आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी मंगळवारी सकाळी सात ते आठ या वेळेत एक तासासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.
मात्र वीज निर्मिती व पुरवठा बंद असल्याने दक्षिण पावर ग्रीड बंद पडला असून अनेक उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे. वीज कर्मचारी संपावर गेल्याने पाण्याचा पुरवठा, रेल्वे, विमानतळ आणि रुग्णालये या अत्यावश्यक सेवांवरही विपरित परिणाम झाला.
श्रीशैलम येथील वीजनिर्मिती प्रकल्प, विजयवाडा, रायलसीमा आणि सिम्हाद्री विद्यूत प्रकल्पात वीजनिर्मिती पूर्णपणे थांबल्याने वीजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वीजेच्या तुटवड्यामुळे तिरूपती व विजयवाडा येथील विमनातळे जनरेटरवर सुरू आहेत.
दरम्यान तेलंगणविरोधात उपोषणाला बसलेले तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना दिल्लीतील आंध्र प्रदेश भवन सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांनी ते फेटाळून उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंध्रमध्ये राष्ट्रपती राजवट नाही
सीमांध्र व रायलसीमा भागात तेलंगणविरोधात उग्र आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी फेटाळून लावली. सीमांध्र व रायलसीमा भागातील नागरिकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. सीमांध्रमधील नागरिकांच्या शिक्षण व नोकरीबद्दलच्या काळजीची दखल केंद्र सरकार घेणार असून त्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णयाविरोधात शनिवारी विजयनगरमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला होता. यात आंदोलकांनी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले होते. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ११० जणांना अटक केली असून, आणखीं काही जणांना अटक करण्यासाठी विशेष पथक बनवले आहे.