कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला केल्याप्रकरणी शिवबा संघटनेचे राजू ज-हाड, अमोल खुणे, बाबू वाळेकर आणि गणेश खुणे या तरुणांना अटक करण्यात आली होती.
औरंगाबाद- कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला केल्याप्रकरणी शिवबा संघटनेचे राजू ज-हाड, अमोल खुणे, बाबू वाळेकर आणि गणेश खुणे या तरुणांना अटक करण्यात आली होती. गेले दीड वर्षे हे तरुण तुरुंगात शिक्षा भोगत होते. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या चारही मावळ्यांना जामीन मंजूर केला.
चार मराठा मावळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असा निर्धार माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला होता. खरे तर या तरुणांना झालेली अटक ही त्यांच्या कोणत्याही वैयक्तीक कारणासाठी झालेली नव्हती. परंतु त्यांची कुणीही दखल घेत नव्हते. ही गोष्ट माजी खासदार निलेश राणे यांना कळली तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांना आधार देत होते. काही महिन्यांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी त्या तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या तरुणांना जामीन मिळावा यासाठी चांगल्या वकिलाची गरज होती. निलेश राणे यांनी जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांना विनंती केली. या न्यायालयीन लढाईसाठी जो काही खर्च येईल, तो करण्याचीही तयारी माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती.
कोपर्डीतील नराधमांना न्यायालयात आणले असता त्यांच्या चेह-यावर कोणत्याही अपराधाची भावना नव्हती. उलट ते निर्लज्जपणे हासत होते. हे लोकांना सहन झाले नाही. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या जमावाने त्या नराधमांना मारहाण केली होती. या प्रकरणी चार मराठा मावळय़ांना अटक करण्यात आली होती. ही गोष्ट कळल्यानंतर निलेश राणे यांनी त्या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तरुणांना कायदा विषयक मदत करून त्यांची तुरुंगातून मुक्तता करायची, असे त्यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची खटल्यासाठी नेमणूक केली. आपण मराठा मावळ्यांच्या पाठीशी उभे राहत आहोत असे जेव्हा निलेश राणे यांनी जाहीर केले तेव्हा त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक करण्यात आले होते. निलेश राणे हे नेहमीच आपल्या समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळून त्या मावळ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला तेव्हा निलेश राणे यांनी दिलेल्या या आधाराने त्या तरुणांचे कुटुंबीय भारावून गेले.