तालुक्यात मागील तीन वर्षात एकूण ३० शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून; यातील केवळ सहा शेतक-यांना मदत मिळाली आहे. तर २४ कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
श्रीगोंदा – तालुक्यात मागील तीन वर्षात एकूण ३० शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून; यातील केवळ सहा शेतक-यांना मदत मिळाली आहे. तर २४ कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे; मात्र युती सरकारकडून शेतक-यांकरता कोणतीही पाऊले उचलली जात नाही. २०१३ पासून आजपर्यंत श्रीगोंदा तालुक्यात एकूण ३० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी केवळ सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत मिळाली आहे. तर २४ कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३ मध्ये एकूण १७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर २०१४ मध्ये पाच शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१५-१६ देखील पाच शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील केवळ सहा शेतक-यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळाली आहे.
दरम्यान, आत्महत्या करणा-या शेतक-यांचे वय सरासरी ४० ते ६५ इतके आहे. घरातील कर्ता व्यक्तीच निघून गेल्याने या शेतक-यांचे कुटुंबीय वा-यावर आले आहेत. यातील काही शेतक-यांच्या मृत्यूला कवटाळून आज दोन ते तीन वर्षे झाली आहेत. असे असतानाही सरकारकडून अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही.