होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मंडळीसह शेजारील राहणा-या आपले अमूल्य मत देण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन येथील अग्रवाल विद्यामंदिरच्या विद्यार्थी व शिक्षकांनी केले..
नागोठणे- कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. विद्यार्थी भावी मतदार असून, होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मंडळीसह शेजारील राहणा-या आपले अमूल्य मत देण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन येथील अग्रवाल विद्यामंदिरच्या विद्यार्थी व शिक्षकांनी केले.
सरकारच्या मतदार जनजागृती कार्यक्रमानिमित्त येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अग्रवाल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी प्रभू आळी, गांधी चौक, खुमाचानाका, शिवाजी चौकमाग्रे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
या रॅलीत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. आर. ठाकूर, नागोठणे तलाठी सजाचे प्रकाश जाधव, संतोष घासे पोलिस ठाण्याचे दत्तात्रय साळवी, विक्रम फडतरे, शाळेचे शिक्षक के. एम. पाटील, विशाल महाडिक, अमित म्हात्रे, संदीप पारंगे, सी. एफ. म्हात्रे, उल्हास ठाकूर, राम पाटील, व्ही. जी. म्हात्रे, संजय कोल्हटकर, के एल जांभळे, टी. एम. पाटील, संजय पाटील, आर. राऊत, विलास पाटील, पांडुरंग कोळी, गजानन मोरवणकर, पुरुषोत्तम घाग, प्रमोद चोगले, भास्कर घाग, हिंमत जाधव, वैभव चितळकर आदी नागरिक सहभागी झाले होते.