सर्वोच्च न्यायालयाकडून सामाजिक विषयांवरील सुनावणीसाठी बुधवारी विशेष पीठाची स्थापना करण्यात आली आहे.
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाकडून सामाजिक विषयांवरील सुनावणीसाठी बुधवारी विशेष पीठाची स्थापना करण्यात आली आहे.
या पीठाकडून महिला, विद्यार्थ्यांबाबतच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. येत्या १२ डिसेंबरपासून शुक्रवारी दुपारी २ वाजता या पीठाचे काम चालेल.
सामाजिक विषयांवरील शेकडो याचिका अनेक वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या खटल्यांचा आढावा घेतला. तसेच हे खटले निकाली काढण्यासाठी हे विशेष पीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.