भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवशी बुकर विजेते सलमान रश्दी यांनी टीका केली आहे.
मुंबई – भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवशी बुकर विजेते सलमान रश्दी यांनी टीका केली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी नेमाडेंवर टीका केली आहे.
‘नेमाडे यांनी शांतपणे पुरस्कार घ्यावा आणि आभार मानावेत. मला अशी शंका आहे की ज्यावर ते टीका करतात ते त्यांनी वाचले आहे की नाही’. असे रश्दी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Grumpy old bastard. Just take your prize and say thank you nicely. I doubt you've even read the work you attack. http://t.co/TavuYkxe2u
— Salman Rushdie (@SalmanRushdie)
February 6, 2015
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमाडे यांनी आपल्या भाषणात रश्दींच्या लिखाणावर टीका केली होती.