वाढत्या तापमानामुळे तुरुंगात आपली तब्येत खालावत असल्याचे कारण देत बुधवारी सुब्रतो रॉय यांनी खटल्याची सुनावणी लवकरात लवकर करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये देशातील तापमान वाढवले त्याची झळ सामान्य जनतेला बसत आहेत. या तापमानामुळे उन्हाचा त्रास आता सहारा समूहाच्या प्रमुखांनाही बसू लागल्या आहेत.
दिल्लीतील वाढत्या तापमानामुळे सुब्रतो रॉय यांना तुरुंगात राहणे असह्य होऊ लागले आहे. वाढत्या तापमानामुळे न्यायालयीन कोठडीत आपली तब्येत खालावत असल्याचे कारण देत बुधवारी रॉय यांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
‘दिवसेंदिवस तापमानाचा जोर वाढत आहे. त्यामुळे कोठडीत असलेल्या रॉय यांची तब्येत खालावत असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकर करण्यात यावी’ अशी याचिका सहारा समूहाचे वकील राजीव धवन यांनी के.एस. राधाकृष्णन आणि जे.एस. शेखर यांच्या खंडपीठाकडे केली.
गुंतवणूकदारांचे वीस हजार कोटींची परतफेड न केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय आणि दोन अधिकारी चार मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधी न्यायालयाने सुब्रतो रॉय यांनी १० हजार कोटी रुपये जमा केल्यास जामीन देणार असल्याचे मंजूर केले होते. मात्र हे पैसे भरणे सहारा समूहास शक्य न झाल्याने रॉय यांचा तुरुंगवास लांबला आहे. गेल्या चार मार्चपासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
यासंदर्भात २१ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रॉय आणि त्यांच्या दोन सहकार्यांना तुरुंगात पाठवण्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता.