यापुढे उष्णतेची तीव्रता अधिकाधिक वाढण्याची भीती असून; सोमवार, २१ मार्च रोजी जिल्ह्याचे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले होते.
सिंधुदुर्ग – यापुढे उष्णतेची तीव्रता अधिकाधिक वाढण्याची भीती असून; सोमवार, २१ मार्च रोजी जिल्ह्याचे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले होते. अचानक वाढलेल्या या तापमानामुळे दुपारचा प्रहर अक्षरश: कायली करणारा होता. सोमवारी सूर्य हा बरोबर विषुववृत्तावर असल्याने मंगळवारी दुपारी सावलीच गायब झाली होती. खगोलतज्ज्ञांनी सोमवारी जवळ आलेल्या सूर्याबाबत अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.
झिरो शॅडोचा अनुभव सोमवारी जिल्हावासीयांनी घेतला. दुपारी १२पासून काही तास कोकणातच नव्हे; तर बहुतांश परिसरातून सावलीच गायब झाली होती. अचानक वाढलेल्या उष्म्यामुळे काही ठिकाणे वणवे भडकले. सिंधुदुर्गात अनेक भागांत सोमवारी अचानक आग लागण्याच्या घटना घडल्या. गेले दोन दिवस उष्म्याची तीव्रता सातत्याने वाढत असून सोमवारी जिह्याचे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचल्याने अंग भाजण्याचा प्रकार अनेकोंना जाणवत होता.
या उन्हाच्या वाढलेल्या झळा पशूपक्ष्यांना सहन करणे शक्य होत नव्हते. दुपारचा प्रहरात हा परिसर जणू चिडीचुप झाला होता. आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्याने या उष्म्याची तीव्रता जाणवत असल्याचे मत हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाढलेल्या तापमानामुळे काजू-आंबा फळांना धोका वाढला आहे.