सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत माहिती आणि सुचना प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी व्यक्त केले.
दिल्ली – कमल हसनच्या विश्वरुपम चित्रपटावर उठलेल्या वादानंतर सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी व्यक्त केले. सिनेमॅटोग्राफीक कायद्याची सत्यता पडळातून पाहण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात यावा किंवा प्रत्येक राज्यस्तरावर त्यासाठी सेन्सॉर्ड बोर्ड स्थापन करण्यात यावे, असे तिवारी यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केले.
सेन्सॉर्ड बोर्डाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत राज्यांनी विश्वरुपमचे प्रक्षेपण थांबवू नये. मद्रास न्यायालयात विश्वरुपमचा खटला सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अंतिम निर्णय आहे असे मानून लोकांनी त्यावर कोणतेही वक्तव्य करु नये तसेच चित्रपटाच्या प्रक्षेपणाला विरोध करु नये, असे तिवारी ट्विट केले आहे. दरम्यान, विश्वरुपमच्या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीकोनातून कमल हसन आपले एक पाऊल पाठी घेत मुस्लिम संघटनांसोबत तडजोडीला तयार झाला आहे.
[EPSB]
कमल हसन तडजोडीसाठी तयार »
अभिनेता कमल हसनने ‘विश्वरूपम’ चित्रपटातील मुस्लिमांना आक्षेपार्ह वाटणारी दुश्ये वगळण्यास तयारी दाखवली आहे.…
[/EPSB]