देशातील विविध राज्यात सेझसाठी घेतलेल्या ९० टक्के जमिनी रिकाम्याच आहेत, अशी माहिती केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात सेझसाठी घेतलेल्या ९० टक्के जमिनी रिकाम्याच आहेत, अशी माहिती केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
लोकसभेत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, सेझसाठी ४८४२.३८ हेक्टर जमीन अधिग्रहित केली होती. त्यापैकी ४४८०.१३ हेक्टर जमीन रिकामी आहे. त्यावर कोणताही उद्योग उभा राहिलेला नाही. ५८ सेझमधील केवळ ३६२.२५ हेक्टर जमीन वापरली जात आहे.
सेझसाठी घेतलेली जमीन ही धोरणानुसार घेतलेली आहे. त्याची पूर्ण प्रक्रिया राज्य सरकारनी राबवली आहे. त्यात केंद्र सरकारने कोणतीही जमीन घेतलेली नाही. राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर त्या जमिनीवर सेझ मंडळाने परवानगी दिली.
सेझसाठी घेतलेली आंध्र प्रदेशात २०४४.१५ हेक्टर जमीन, महाराष्ट्रात ५३६.१३ हेक्टर, तामिळनाडूत २९५.५१ हेक्टर जमीन रिकाम्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ‘सेझ’मधून २.२१ लाख कोटींची निर्यात झाली. गेल्यावर्षी याच काळात ४.६३ लाख कोटींची निर्यात झाली होती. सेझमधून १५.४४ लाख जणांना रोजगार मिळाला.
भारतातून कृषी निर्यात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान वाढली आहे. ती १७.९५ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. कृषी माल निर्यात करण्यात भारताचा जगात ७ वा क्रमांक आहे.