लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हफिझ सईदने भारताने केलेल्या दावा शनिवारी फेटाळून लावला.
लाहोर- मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ‘लष्कर-ए-तय्यबा’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हफिझ सईदने भारताने केलेल्या दावा शनिवारी फेटाळून लावला. पाकिस्तान सैन्याकडून आठ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यापूर्व सईदने पाकिस्तान व्याप्त काश्मीरला भेट दिल्याची माहिती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती.
या परिसराला आपण भेट दिल्याचा कोणताही पुरावा भारताकडे नसल्याचे सईदने म्हटले आहे. शिंदे यांनी केलेला आरोप चुकाचा असल्याचे सईदने म्हटले आहे. आपण पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे कोणतेही पुरावे असल्यास भारताचे सर्व आरोप मान्य करेण असे त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानमधील ज्यांनी भारताला विशेष राष्ट्राचा दर्जा देण्याची मागणी केली आहे त्यांना भारताचा खरा चेहरा आता दिसत असेल असे सईदने म्हटले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे सईदचा हात असल्याचे भारताने त्याच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे.