श्रीलंकन नौदलाने दोन महिन्यांपुर्वी तामिळनाडूच्या ८६ मच्छिमारांना अटक केली होती. त्यांची येत्या २८ ऑक्टोबरला सुटका करण्यात येणार आहे.
रामेश्वरम्- श्रीलंकन नौदलाने दोन महिन्यांपुर्वी तामिळनाडूच्या ८६ मच्छिमारांना अटक केली होती. त्यांची येत्या २८ ऑक्टोबरला सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती तामिळनाडू सरकारने रविवारी दिली.
तामिळनाडू सरकारही याच दिवशी त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन श्रीलंकन मच्छिमारांची सुटका करणार आहे.
श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकन नौदलाने २२ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरच्या काळात या तामिळ मच्छिमारांना अटक केली होती. नागापट्टणम्, रामानाथापुरम् या भागातील तामिळ मच्छिमारांना अटक झाली होती.
जयललिता यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या मच्छीमारांची सुटका शक्य झाली. मच्छीमारांच्या सुटकेसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात पत्र लिहीली होती. सुटकेसाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी त्यांनी विनंती केली होती.