पाकिस्तानमध्ये सध्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून पाकिस्तानात मोठी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून पाकिस्तानात मोठी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान तहेरिक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान याचे हजारो समर्थक संसदेसमोर धरणे धरून बसले आहेत. नवाज शरीफ जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजीनाम्याच्या मागणीशिवाय आंदोलकांनी अन्यही काही मागण्या पुढे केल्या आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाला धर्मगुरू ताहीरुल कादरी यांच्या समर्थकांचे बळ मिळाले आहे.
सरकारने या आंदोलकांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्यांनी आधी धरणे आंदोलन मागे घ्यावे, मगच चर्चा होईल, अशी अट घातली आहे. या संबंधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु सर्वोच्च न्यायालयाने धरणे आंदोलनाला स्थगिती दिली नाही. त्यामुळे एक प्रकारे आंदोलकांची सरशी झाली आहे आणि त्यांनी आधी चर्चा करा मग आंदोलन थांबवू, अशी अट घातली आहे. विशेषत: इम्रान खान याने आधी राजीनामा दिला पाहिजे, असा हट्ट धरला आहे. इम्रान खान हा काही मोठा राजकारणी माणूस नाही. त्याने एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ कर्करोगावरील एक रुग्णालय उभे करण्याचे घोषित केले आहे.
क्रिकेटमधील लोकप्रियतेचा राजकारणात उपयोग करून घेण्यासाठी त्यांना पक्ष काढला खरा. पण आतापर्यंत त्यांच्या पक्षाला काही यश आलेले नाही. त्याच्या पक्षाने आजवर दोन वेळा सार्वत्रिक निवडणूक लढवली. मात्र एका राज्यात संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याएवढी ताकद मिळवण्यापलीकडे इम्रान खान याला राजकारणात यश मिळालेले नाही. संसदेत तर त्यांचा एक सदस्य आहे. इम्रान खानचे नेमके वर्णन करायचे झाले तर थोडय़ाबहुत फरकाने तो पाकिस्तानचा अरविंद केजरीवाल आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणुका होऊन दोन वष्रे झाली आहेत आणि त्या निवडणुकीत शरीफ यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केला याचा साक्षात्कार इम्रानला आता झाला आहे. खरे म्हणजे त्याच्या आंदोलनाने शरीफ राजीनामा देणार नाहीत. मात्र कादरी यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला थोडेसे बळ आले आहे.
कादरी हा माणूससुद्धा असाच हंगामी राजकारणी आहे. तो मुळात राहतो कॅनडामध्ये आणि कधी तरी लहर आली की, पाकिस्तानात येऊन कसले तरी आंदोलन करतो. राजकीय आणि लष्करी असंतोषामुळे पाकिस्तान एक अशांत देश बनला आहे. पाकिस्तानातील लोकशाहीला नेहमी लष्करशाहीचा आधार लागतो. लोकशाही असो की, लष्करशाही पाकिस्तान हा नेहमीच असंतोषाने धुमसणारा देश बनला आहे. दहशतवाद तसेच आर्थिक, सामाजिक समस्यांच्या गर्गेत सापडलेल्या पाकिस्तानचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. शरीफ पंतप्रधानपदी आल्यानंतरही राजकीय आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे लोकांच्या मनातील असंतोषाचा, धुमसणा-या खदखदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न इम्रान खान करत आहेत. त्यातून हे धरणे आंदोलन उभे राहिले आहे.
नरेंद्र मोदीनी पाकिस्तान मध्ये चालेल्या याच संधीचा फायदा घेतं त्यानी पाकिस्तीनी उच्चायुक्त याना तुम्ही भारताबरोबर चर्चा करायची असेल तर तुम्हांला कश्मीर मधील फुटीरत्यावाद्याबरोबर चर्चा करता येणार नाही.नरेंद्र मोदी यांनी या संधीचा फायदा घेत आंतराष्ट्रीय राजकारणात षटकार मारण्याचा मारलेला आहे.
तुषार रूपनवर, मास मिडीया, रूईया काँलेज