बॉलिवूड अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यामुळे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित राहू शकलेला नाही.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यामुळे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित राहू शकलेला नाही. त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत सांगितले.
पुण्यातील बालेबाडीमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल रविवारी जाहीर होत आहेत. यावेळी त्याने आपल्या अनुपस्थिती बाबत सांगताना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नीता अंबानी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोक उपस्थित आहेत.
अभिनेता आमीर खानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्याने आपल्याला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे सांगितले.
नीता अंबानी यांचा मराठीत संवाद
या कार्यक्रमात मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांनी मराठीत भाषण केले. पाणी फाऊंडेशनमुळे आमीर खान खरा हिरो झाला, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.