‘योगाच्या माध्यमांतून शांततेबाबत बोलत आहोत. मात्र, एखाद्याला जर ही भाषा कळत नसेल तर त्याला युद्धाच्या भाषेतच उत्तर द्यायला हवे असे’, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
मुंबई- ‘योगाच्या माध्यमांतून शांततेबाबत बोलत आहोत. मात्र, एखाद्याला जर ही भाषा कळत नसेल तर त्याला युद्धाच्या भाषेतच उत्तर द्यायला हवे असे’, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. मुंबईत जागतिक शांती आणि एकता परिषदेत रामदेव बाबा बोलत होते.
‘चीन वारंवार भारताला युद्धाची धमकी देत आहे. मात्र, स्वतःहून युद्धाला आमंत्रण देणार नाही, अशी आपली भुमिका असल्याचे भारताकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आता चीनला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे,’ अशी भूमिका रामदेव बाबा यांनी स्पष्ट केली.
‘चीनचा शांततेवर विश्वास नाही, त्यांचा शांतता राखण्याचा हेतू असता तर दलाई लामा यांना वारंवार भारतात येण्याची गरजच पडली नसती’, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी भीती, चीडचीड निर्माण करते, चीडचीड, रागाला जन्म देते आणि राग, शेवटी हिंसा घडवून आणतो, अशा शब्दांत चीनच्या वृत्तीवर भाष्य केले.