जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील.
अहमदाबाद- जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल केले. त्यामुळे देशात दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सांगितले.
गुजरातमधील निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मोदींनी जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या बदलांचा दाखला देताना सांगितले की, आज देशातील अनेक वृत्तपत्रांच्या मथळ्यात देशात १५ दिवस आधीच दिवाळीचे आगमन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील लोक आनंदित झाले आहेत. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल करून सामान्यांना दिलासा दिला, असे मोदींनी सांगितले.
तसेच देशातील लोक सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देत असल्याचा दावाही त्यांनी केला. जेव्हा लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा लोकांनी त्याला पाठिंबा देणे नैसर्गिक आहे. सध्या देशातील सामान्य जनतेला विकासाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, असे वाटते. कोणालाही त्यांच्या मुलांनी गरिबीत आयुष्य काढावे, असे वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गरिबीशी लढा देण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन मोदींनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. आज द्वारकाधीश मंदिरात पूजा केल्यानंतर ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्दय़ावरून मोदी सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. तसेच जीएसटीची व्यवस्थित अंमलबजावणीही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, मोदींनी हे सर्व आरोप फेटाळून लावत देश प्रगतिपथावर असल्याचे म्हटले होते.
[EPSB]
कोकणात साहित्य संपदा आहे, मग आर्थिक का नाही?
[/EPSB]