गेल्या अनेक दिवसांपासून सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर मिटणार आहे.
नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर मिटणार आहे. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून भारत आणि चीनमधील संबंध डोकलाम वादामुळे बिघडले होते. दोन्हीकडचे सैनिक आमनेसामने उभे ठाकले होते. चीन भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देत होता. पण, भारत जराही डगमगला नाही. उलट, अत्यंत संयमी भूमिका घेऊन त्यांनी चीनचीच कोंडी केली.
‘डोकलाममधून आम्ही मागे हटणार नाही… हा भूभाग आमचाच आहे… तुमचे सैनिक मागे हटले नाहीत, तर १९६२ पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील…’, अशा धमक्या देणा-या चीनला अखेर भारताच्या आक्रमक भूमिकेपुढे माघार घ्यावी लागली आहे.
अत्यंत संयमी भूमिका घेऊन त्यांनी चीनचीच कोंडी केली. आधी सैन्य मागे घेऊ, मग चर्चेतून हा वाद सोडवू, या पवित्र्यावर ते ठाम राहिले. त्यामुळे चीनवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि अखेर त्यांना भारतापुढे नमते घ्यावे लागले आहे.
संबंधित बातम्या
डोकलामसारखे प्रकार वाढण्याची शक्यता- लष्करप्रमुख
डोकलाम विवाद : नियंत्रण रेषेवर चिनी ड्रॅगनची घुसखोरी वाढणार
डोकलाम प्रकरणी जपानची भारताला साथ
चीनचा आता समुद्रात युद्धसराव
चीनचा खोडसाळपणा
चीनच्या धमक्यांचा गर्भितार्थ
आम्ही भारतात घुसलो तर खळबळ माजेल
चीनचं खरं दुखणं काय?
[EPSB]