ध्यान म्हणजे एकरूप होणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो! ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते.
डोळे बंद करा व आपल्या नसर्गिक श्वासाबरोबर राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मन:शांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.
ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे. आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो.
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळजींमुळे होतात. सर्व मानसिक काळजी बौद्धिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याने येते.
ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे.
पूर्वी केलेल्या वाईट कर्मामुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहीसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.
स्मरणशक्ती वाढते
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.
वाईट सवयी नष्ट होतात
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अति विचार करणे, अति मद्यपान करणे, तंबाखू खाणे इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
मन आनंदी होते
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.
कार्यक्षमता वाढते
भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोडय़ा वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.
झोपेचे तास कमी होतात
ध्यानात मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अध्र्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.
दर्जेदार नातेसंबंध
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्परसंबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
विचारशक्ती वाढते
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवतात आणि सर्व इच्छा नाटय़पूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
जीवनाचा उद्देश
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेवून, विशेष कामाकरिता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.
सामूहिक ध्यान साधनेचे महत्त्व काय आहे?
शंभर लोक एकत्रितपणे साधना करतात तेव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी.पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहे की, एका अणूचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला हजारो वर्षापूर्वी सांगितली आहे की, पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरित ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल. पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डीसीमध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्हयांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञांना याचे कारण कळले नाही म्हणून त्यांनी याला ‘महर्षी इफेक्ट’ असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.