पाकिस्तानचा टेररिस्तान झाला असून हा देश जगभरात दहशतवाद पसरवत आहे, असा जोरदार हल्ला भारताने पाकिस्तानवर केला आहे.
जिनिव्हा- पाकिस्तानचा टेररिस्तान झाला असून हा देश जगभरात दहशतवाद पसरवत आहे, असा जोरदार हल्ला भारताने पाकिस्तानवर केला आहे. भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव एनम गंभीर यांनी ‘राइट टू रिप्लाय’ अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
काश्मीरमधील नागरिकांचा संघर्ष चिरडण्याचे काम भारत सरकार करते आणि पाकमध्ये दहशतवादही पसरवते , अशा ‘उलट्या बोंबा’ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी यूएनच्या महासभेत मारल्या होत्या. काश्मीरमध्ये विशेष दूत नेमण्याची मागणी त्यांनी केली होती. काश्मीर मुद्यावरून वारंवार बोलणा-या पाकिस्तानवर एनम गंभीर यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला.
‘पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. त्यांच्या भूमीत दहशतवाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान पीडित असल्याचा दावा करत आहे याचे आश्चर्य वाटते,’ असे गंभीर यांनी यावेळी म्हटले आहे.
‘पाकिस्तानने कोणत्याही गैरसमजुतीत राहू नये. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, सीमेपलीकडून कितीही दहशतवादी कारवाया झाल्या, तरी भारताची एकता आणि अखंडता कायम राहील,’ असा निर्धारही भारताने यावेळी व्यक्त केला.
पाकिस्तान हे ‘टेररिस्तान’ असून दहशतवादाच्या जागतिकीकरणात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. ज्या पाकिस्तानात दहशतवादी रसत्यावर फिरतात, त्या देशाने भारतातील मानवाधिकारांच्या रक्षणावर भाषण दिलेले आम्ही ऐकले आहे. मात्र जगाला एका अपयशी देशाकडून लोकशाही आणि मानवाधिकाराचे धडे शिकण्याची गरज नाही, असे म्हणत गंभीर यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.
Even as terrorists thrive in Pak & roam its streets with impunity, we have heard it lecture about protection of human rights in India: India pic.twitter.com/GsrvxAdZdD
— ANI (@ANI)
World does not need lessons on democracy and human rights from a country whose own situation is charitably described as a failed state:India pic.twitter.com/qQ1qjpbQcA
— ANI (@ANI)