नाशकातील साठेबाज कांदा व्यापा-यांनी दुबई हवालामार्फत ‘काळ्याचे पांढरे’ केल्याचा संशय निर्माण झाला आहे. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली फक्त पैसे आणले गेले. कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे.
नाशिक- नाशकातील साठेबाज कांदा व्यापा-यांनी दुबई हवालामार्फत ‘काळ्याचे पांढरे’ केल्याचा संशय निर्माण झाला आहे. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली फक्त पैसे आणले गेले. कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे. तीन टक्के व्याजदराने पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. नाशिकमधील सात बडय़ा व्यापा-यांनी कांद्याची साठेबाजी करत कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप आहे.
प्रशासनाच्या तंबीनंतर कांदा व्यापा-यांनी पुन्हा व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकरच्या धाडींविरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांदा बाजार बंद होते. नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापा-यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा इफेक्ट लगेच दिसायला लागला. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले. नाशिक जिल्ह्यात २० अधिका-यांच्या पथकाकडून ७ व्यापारी, २५ घरे, गोदामे आणि कार्यालयाची झाडाझडती करण्यात आली.
साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवणा-या व्यापा-यांना वेसण घालण्यासाठी ही कारवाई केल्याची माहिती आहे. या
छापेमारीमुळे व्यापा-यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक जिल्हयातील कांदा लिलाव ठप्प झाले. गेल्या काही दिवसांत मुंबईत कांद्याने तिशी गाठली. पण शेतक-यांना फक्त १५ रुपयांचा दर मिळायचा. मधले कमिशन व्यापारी लाटायचे. साठेमारी करून कांद्याचे दर वाढवण्यात व्यापा-यांचा हात असल्याचा आरोप आहे.
[EPSB]
टीएमडब्ल्यूतर्फे भारतातील आधुनिक फूड वॉलेटचे लोकार्पण
[/EPSB]