दिल्लीवर १९५ धावांनी मात करत महाराष्ट्राने विजय हजारे चषक वनडे स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला.
कटक- दिल्लीवर १९५ धावांनी मात करत महाराष्ट्राने विजय हजारे चषक वनडे स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. केदार जाधवचे झटपट शतक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
‘ब’ गटात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३६७ धावांचा डोंगर रचला. तिथेच मोठा विजय निश्चित झाला. प्रतिस्पध्र्याचे ३६८ धावांचे लक्ष्य पार करताना दिल्लीचा डाव ३३.४ षटकांत १७२ धावांत संपला. कर्णधार केदार जाधवने अवघ्या ६४ चेंडूंत ११३ धावांची झटपट खेळी करताना महाराष्ट्राला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने ११ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. त्याला निखिल नाईक (४६ चेंडूंत ६३ धावा) आणि नौशाद शेखची (६४ चेंडूंत ५२ धावा) चांगली साथ लाभली.
महाराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू जगदीश झोपेने १९ धावांत पाच विकेट घेताना दिल्लीला झोपवले. त्याच्या अचूक मा-यासमोर दिल्लीचा डाव ३३.४ षटकांत १७२ धावांत संपला. दिल्लीतर्फे केवळ चार फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात सर्वाधिक योगदान अनुभवी सलामीवीर आणि कसोटीपटू गौतम गंभीरचे (५३ धावा) आहे.
महाराष्ट्राने सातत्य राखले मुंबईला मध्य प्रदेशकडून पराभव पाहावा लागला. ‘क’ गटात मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज चंद्रकांत सकुरे (५ विकेट) आणि ऑफस्पिनर सारांश जैनसमोर (३ विकेट) मुंबईच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांच्या सात फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या. त्यात सर्वाधिक २४ धावा चौथ्या क्रमांकावरील अभिषेक नायरच्या आहेत. मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव आणि तळातील फलंदाज शार्दूल ठाकूरला खातेही खोलता आले नाही. मुंबईचा तीन सामन्यांतील हा पहिला पराभव आहे.
तत्पूर्वी, मध्य प्रदेशचा डाव २१४ धावांत संपला. मात्र इतक्या धावाही प्रतिस्पध्र्यासाठी पुरेसा ठरला. मधल्या फळीतील सोहराब धालिवाल (५१) आणि प्रथमश्रेणी पदार्पण करणा-या अंकित दाणेने (४६) मध्य प्रदेशला तारले.
मुंबईतर्फे मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने तीन तसेच शिवम मल्होत्रा आणि सिद्धेश लाडने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. विदर्भ, झारखंडचाही विजय ‘अ’ गटात विदर्भ, ओदिशा आणि बडोदा, ‘क’ गटात बंगाल, राजस्थान, गुजरात, ‘ड’ गटात छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक आणि ‘ब’ गटात तामिळनाडू तसेच त्रिपुराने विजय मिळवले.