कट्टा, गँग, लेक्चर बंक, कँटीन असे शब्द तुम्ही नेहमीच कॉलेजमध्ये ऐकत असाल. लेक्चर बंक करून पिक्चरला जाणं किंवा कुठेतरी फिरायला जाणं म्हणजे काही निराळं नाही किंवा यात काही नवीनही नाही. प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी आपल्या कॉलेजविश्वात असे उद्योग करतच असतो.
कट्टा, गँग, लेक्चर बंक, कँटीन असे शब्द तुम्ही नेहमीच कॉलेजमध्ये ऐकत असाल. लेक्चर बंक करून पिक्चरला जाणं किंवा कुठेतरी फिरायला जाणं म्हणजे काही निराळं नाही किंवा यात काही नवीनही नाही. प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी आपल्या कॉलेजविश्वात असे उद्योग करतच असतो. पण या सगळ्या गोष्टींपासून वेगळे राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारेही विद्यार्थी आपल्याला कॉलेज परिसरात दिसतात. त्यातीलच एक म्हणजे सांस्कृतिक विभागात असणारे विद्यार्थी.
नाटक, एकांकिका, कॉलेजचे इतर कार्यक्रम मॅनेज करण्याची यांची जबाबदारी असते. आता तुम्ही म्हणाल हे विद्यार्थी कुठे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत असतात? याच तुमच्या प्रश्नाचं आज मी उत्तर देणार आहे. एकांकिकेत काम करणारी ही मंडळी नक्की काय आणि कसला विचार करत असतात बरे?
एकांकिका हे एक माध्यम झालं. तसंच चित्रपटाच्याही बाबतीत. चित्रपटाची दुनिया न्यारी असते. या चंदेरी पडद्यावर काम करण्याची प्रत्येक कलाकाराची सुप्त इच्छा असतेच. पण हा चंदेरी पडदा सोडून तरुणाई पुन्हा आपली संस्कृती जपताना दिसते. नाटक, एकांकिकामुळे तरुणामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.
कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन आज अनेक कलाकार मोठे झाले आहेत. त्यांचाही असाच अनुभव आहे की, कलाकाराला फार वेळ जर या क्षेत्रात राहायचं असेल तर त्याच्यामागे थिएटरची पार्श्वभूमी असणं फार गरजेची असते. एकांकिका स्पर्धेतून आलेला कलाकार हा उत्तमच असतो यात काही शंका नाही. कारण एकांकिका करताना अनेक गोष्टी हाताळायची सवय लागलेली असते.
एक विषय घेऊन त्यावर रिसर्च करणे त्यावर अगदी जीव तोडून अभ्यास करणे मग त्याची एक कथा तयार करण्यापासून ते एकांकिका बसेपर्यंतचा प्रवास हा खूप वेगळा आणि उत्साह निर्माण करून देणारा असतो. एखाद्या हॉलिवुड चित्रपटालाही लाजवेल इतके आशयघन विषय एकांकिकांतून विद्यार्थी मांडताना दिसतात. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, संगीत या सा-या गोष्टी कौतुकास्पदच असतात. एक विषय ४५ मिनिटांत मांडणं, त्यातून लोकांपर्यंत एखादे आशय पोहोचवणं हे आजच्या पिढीसाठी एक आव्हान आहे. हे आव्हान तरुण अगदी जोषाने पार पाडतात.
काही जण म्हणतात की, माणसं नाटकापासून दुरावत जात आहेत, मात्र हे विधान अगदी चुकीचं आहे. पण या अशा वेगवेगळ्या कलाकृती पाहण्यास मिळत असतील हा विचार करणं चुकीचं आहे. दिवसभर लेक्चर बंक करून सराव कराणारे तरुण कट्टयावर भरकटत आहेत. पण सांस्कृतिक विभातील ही मुलं लेक्चर बंक करून आपली एकांकिका कशी चांगली होईल याचाच विचार करत असतात.
काही जण एकांकिका हे क्षेत्र आवड म्हणून करतात तर काही जण याचा करिअर म्हणून विचार करत असतात. पण यामध्ये प्रत्येकात चांगली गोष्ट म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी निर्माण होते. शाहरुख, सलमानचे सिनेमे बघण्याच्या पलीकडे आम्ही करतोय, ते नाटक बघायला प्रेक्षकांना कसं आवडेल याकडे तरुणाई फार लक्ष ठेवत असते. थोडक्यात काय तर नाटक हे माध्यम कधीच लयाला जाऊ शकत नाही. उलट ते प्रत्येकवेळी नव्याने जन्म घेत असते.