Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeवार्षिक राशिभविष्यवार्षिक राशीभविष्य- मेष

वार्षिक राशीभविष्य- मेष

२० ऑक्टोबर २०१७ ते ०८ नोव्हेंबर २०१८

‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास आहे. मेंढय़ाप्रमाणे लढाऊपणाने व निकराने कोणत्याही प्रसंगात टक्कर घेण्याचा आपला स्वभाव आहे. आपण शूर व करारी आहात. स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली चाकरी करणे आपल्याला नापसंत असते. प्रत्येक क्षेत्रात बाणेदारपणे, तडफदारपणे व आत्मविश्वासाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे.

मूर्तिमंत चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्टय़ आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाडय़ात धर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. आपल्याच धुंदीत व मस्तीत बेगुमानपणे व उन्मत्तपणे आक्राळविक्राळ लाटांनी फेसाळत दुथडी भरून पूर आलेल्या व वेगाने वाहणा-या नदीसारखा आपला स्वभाव आहे. संकटकाळी न घाबरणारी साक्षात मृत्यूच्या जबडय़ात प्रवेश करणारी आपली रास आहे. कसल्याही नाठाळ घोडय़ाला वठणीवर आणणारी आपली रास आहे. कसलेल्या स्वाराप्रमाणे आपली घोडय़ावरील मांड पक्की असते. झुंजारपणा हे आपले खास वैशिष्टय़ आहे. शौर्य, धाडस, धडाडी, साहस, धैर्य, निग्रह, निश्चय व आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती, मनोनिग्रह, स्वातंत्र्यप्रेम या गोष्टी उपजतच आपल्याकडे असतात. सम्राट सिकंदराप्रमाणे सारे जग जिंकावे असे आपणास वाटत असते. नेपोलियनप्रमाणे ‘अशक्य’ हा शब्द आपल्याही शब्दकोषात नसतो.

आपल्या व्यक्तिमत्त्वात रग आहे. मनगटात जोर आहे. व्यक्तिमत्त्वात अपूर्व ताकद आहे. स्वभाव बाणेदार आहे. आपल्या स्वभावात हुकूमशाही आहे. आपले बोलणे, वागणे आक्रमक वृत्तीचे असते. हातात काहीही राखून न ठेवण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्याला आपल्या मानी स्वभावामुळे अपमान सहन होत नाही. आपली मते व विचार इतरांवर लादण्याचा आपला स्वभाव आहे. कुटुंबातील, ऑफिसमधील, संस्थेतील सर्वानी आपल्याच तंत्राने वागावे असे आपणास वाटत असते. आपल्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. आपण गतिमानतेने, वेगाने, त्वरेने काम करणारे असता, त्यामुळे अनेक संस्थांचे नेतृत्व आपणाकडे चालून येते.

आपला स्वभाव कडक असतो. तापट असतो. काहीवेळा फटकळही असतो. दुस-यावर वर्चस्व गाजविण्यात आपल्याला आनंद वाटतो. नमते घेणे, माघार घेणे आपल्या स्वभावात नसते. आपल्याला चटकन संताप येतो. आपण थोडेसे भांडखोर असता. मात्र आपल्याकडे चिकाटी आहे. जिद्द आहे. सतत गतिमान राहून परिस्थितीचा वेध घेऊन पुढे जाण्याची ईर्षा आहे. नराश्याने हातपाय गाळून स्वस्थ बसण्याचा आपला स्वभाव नाही. आपल्या वृत्तीत गर्वष्ठिपणा आहे. अहमपणा आहे. स्वभावात मानीपणा आहे. आपल्याकडे थोडे क्रौर्य आहे. निष्ठूरपणा आहे. कोपिष्टपणा आहे. त्याचप्रमाणे काहीवेळा उतावीळपणाने व अविचाराने कार्य करण्याची व निर्णय घेण्याची आपली वृत्ती आहे. आपल्या बोलण्या-चालण्यातून घमेंडी स्वभाव दिसून येतो. आपणाला प्रवासाची आवड असते. आपले ठिकाण वारंवार बदलण्याची आवड असते. परिस्थितीला हवे तसे वळण आपण देऊ शकता. परंतु, त्याचबरोबर आपला स्वभाव हा शिपाई गडय़ासारखा रांगडा व सरळधोपट असतो. प्रत्येक गोष्टीत धांदल, धावपळ करण्याची आपणाला सवय असते. आपली रास ही आरंभशूर आहे. नेतृत्व करणारी सामर्थ्यवान अशी आपली रास आहे.

मेष या राशीमध्ये आश्विनी, भरणी व कृत्तिका ही तीन नक्षत्र येतात. आश्विनी नक्षत्रातील चारही चरण, भरणी नक्षत्रातील चारही चरण व कृत्तिका नक्षत्रातील फक्त पहिल्या चरणाचा समावेश मेष राशीमध्ये होतो.

मेष रास व आश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – विद्वान, चतुर, सौंदर्यप्रेमी, स्वच्छतेची आवड, स्वकार्यदक्ष, चलाख, सुखी, यशस्वी, मानसिकदृष्टय़ा स्थिर, व्यवहारकुशल, विनयशील, काहीवेळा जास्त उतावळेपणा, काही प्रमाणात विश्वासघातकी.
मेष रास व भरणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – वाचाळ, भाग्यवादी, धनाढय़, भोजनप्रिय, कृतघ्न, काही वेळा क्रूर व निष्ठूर, विचारात अस्थिरता, भोगप्रिय, सुगंधित वस्तूंचे शौकीन.

मेष रास व कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – तेजस्वी, विद्वान, चतुर, राजासमान आचरण, स्वाभिमानी, गुप्त विद्येमध्ये रस असणारे, स्त्री सान्निध्याच आकर्षण असणारे, प्रसिद्धी मिळविणारे, काही प्रमाणात चलाख व क्रोधी.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
अश्विनी नक्षत्र – चू, चे, चो, ला
भरणी नक्षत्र – ली, ले, लू, लो
कृत्तिका नक्षत्र – अ

खालीलप्रमाणे आपणाला आपल्या ग्रहस्थितीप्रमाणे विविध विषयांवर फळे प्राप्त होणार आहेत.

आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगल्या स्वरूपाचे ठरणार आहे. विशेषत: १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. या कालखंडात सौख्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. या कालखंडात आपण व्यवसायाकडे लक्ष देऊ शकाल. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडू शकाल. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या कालखंडात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. या कालखंडात व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. सर्वसाधारणपणे हे वर्ष मेष व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे.
खालील कालखंडामध्ये आरोग्य चांगले राहणार आहे.
दि. ०१/१२/२०१७ ते दि. २८/१२/२०१७
दि. ०२/०१/२०१८ ते दि. १६/०१/२०१८
दि. ०३/०५/२०१८ ते दि. ०७/०७/२०१८
दि. ०१/०८/२०१८ ते दि. ३१/०८/२०१८
दि.२०/०९/२०१८ ते दि. ०४/११/२०१८

खालील कालखंडामध्ये आपल्याला प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खालील कालखंडात प्रकृतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
दि. २०/१०/२०१७ ते दि. २९/११/२०१७
दि. १८/०१/२०१८ ते दि. ०७/०३/२०१८
दि. २९/०३/२०१८ ते दि. ३१/०४/२०१८

खालील कालखंडामध्ये तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.
दि. ०८/०३/२०१८ ते दि. २८/०३/२०१८

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. आíथक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करू शकता. विशेषत: २५ ऑक्टोबर २०१७ नंतरचा कालखंड व्यवसायात भरभराट होण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. यावर्षी आपण व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

२५ ऑक्टोबर २०१७ नंतर आíथक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड चांगला आहे. या कालखंडात आपल्याला नवनवीन योजनांची अंमलबजावणी करता येईल.

खालील कालखंड आपणाला आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले जाणार आहे.
दि. २६/१०/२०१७ ते दि. ३१/१२/२०१७
दि. २७/०१/२०१८ ते दि. १२/०२/२०१८
दि. २१/०२/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. १९/०४/२०१८ ते दि. १४/०६/२०१८
दि. १७/०८/२०१८ ते दि. १७/०९/२०१८
दि. ०१/०९/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

वरील कालखंड हे व्यवसाय करणा-या व्यक्तींना लाभदायक ठरणार आहेत, तर व्यवसाय न करणा-या व्यक्तींनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आर्थिक लाभ होणार आहेत.

खालील कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. या कालखंडात महत्त्वाचे निर्णय, बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करून घ्यावेत.
दि. ०८/०३/२०१८ ते दि. १८/०४/२०१८

खालील कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. २५/१०/२०१७

नोकरी
हे वर्ष मेष व्यक्तींना नोकरीमध्ये समाधानकारक राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या वर्षी आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला अपेक्षित संधी लाभेल. नोकरीमध्ये आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही.
हे वर्ष यशाचे आहे व बढतीचे आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाची, कर्तबगारीची, ज्ञानाची व अनुभवाची दखल घेतली जाणार आहे व तुम्हाला पदोन्नती किंवा बढती लाभणार आहे.

खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना अनुकूल ठरणार आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. १५/११/२०१७
दि. १५/०१/२०१८ ते दि. १४/०३/२०१८
दि. १५/०६/२०१८ ते दि. १६/०७/२०१८

खालील कालखंड मेष व्यक्तींना बढतीच्या दृष्टीने चांगला आहे.
दि. १५/०४/२०१८ ते दि. १४/०५/२०१८
दि. १७/१०/२०१८ ते दि. ०७/११/२०१८

खालील कालखंड नोकरीच्या दृष्टीने चांगला जाणारच आहे. परंतु या कालखंडा वरिष्ठांचे व थोरामोठय़ांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.
दि. १७/०८/२०१८ ते दि. १६/०९/२०१८

खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहेत. या कालखंडात वरिष्ठांकडून फार सहका-याची अपेक्षा करू नये. थोरामोठय़ांबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
दि. १६/११/२०१७ ते दि. १३/०१/२०१८
दि. १७/०९/२०१८ ते दि. १६/१०/२०१८

प्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने मेष व्यक्तींना हे वर्ष सामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करावा. घाई, गडबडीत कोणतीही गुंतवणूक करू नये. गडबडीने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. तरीही दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतर प्रॉपर्टीच्या व्यवहारात येणा-या अडीअडचणी कमी होतील.

प्रॉपर्टी, गाडी, बंगला, जागा, जमिनी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. परंतु ज्यांना प्रॉपर्टीचे व्यवहार करणे गरजेचे आहे त्यांना खालील कालखंड लाभदायक ठरतील.

खालील कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.
दि. ०३/११/२०१७ ते दि. २६/११/२०१७
दि. १४/०१/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. २७/०३/२०१८ ते दि. १८/०४/२०१८
दि. ०९/०६/२०१८ ते दि. ०३/०७/२०१८
दि. ०२/०९/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरेल.
दि. २८/११/२०१७ ते दि. १२/०१/२०१८
दि. ०२/०३/२०१८ ते दि. २६/०३/२०१८
दि. १५/०५/२०१८ ते दि. ०८/०६/२०१९
दि. ०१/०८/२०१८ ते दि. ३०/०८/२०१८

संततीसौख्य
हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना संततीसौख्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. मागील वर्षी आपणाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असेल. परंतु त्या अडचणी आता कमी होणार आहेत. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. विशेषत: दि. २५ ऑक्टोबर २०१७ नंतरचा कालखंड मुलामुलींच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अत्यंत चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळेल.

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी वाढणार आहे. सर्वसामान्यपणे संततीसौख्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले ठरणार आहे. मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत उरकून घ्यावेत.

खालील कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल व यशदायक ठरणार आहेत.
दि. २५/१०/२०१७ ते दि. १५/११/२०१७
दि. १४/०१/२०१८ ते दि. १२/०२/२०१८
दि. १४/०४/२०१८ ते दि. १४/०५/२०१८
दि. १७/०८/२०१८ ते दि. १६/०९/२०१८
दि. १८/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंडात काहींना मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. या कालखंडात विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. या कालखंडात अपेक्षित यश न मिळाल्यास निराशावादी होऊ नये.
दि. १७/११/२०१७ ते दि. १२/०१/२०१८
दि. १५/०३/२०१८ ते दि. १२/०४/२०१८
दि. १७/०९/२०१८ ते दि. १६/१०/२०१८

खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने मेष व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
दि. १४/०२/२०१८ ते दि. १४/०३/२०१८
दि. १७/०७/२०१८ ते दि. १५/०८/२०१८

विवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना समाधानकारक ठरणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. सध्या गुरू सातवा आहे. परंतु दि. १२ ऑक्टोबर २०१८ ला गुरू वृष्टिद्धr(155)क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतर मेष राशीच्या व्यक्तींना गुरू आठवा होणार आहे. दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये प्रयत्नवादी रहावे. या कालखंडात सर्वसामान्यपणे वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. आरोग्याची अपेक्षित साथ लाभेल.

दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतर वैवाहिक जीवनात शांत व संयमी रहावे. या कालखंडात महत्त्वाची कामे मार्गी न लागल्यास निराश होऊ नये. या कालखंडात मतभेद टाळावेत.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. ०४/११/२०१७ ते दि. २६/११/२०१७
दि. १६/०१/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. २७/०३/२०१८ ते दि. १०/०५/२०१८
दि. १०/०६/२०१८ ते दि. ०४/०७/२०१८
दि. ०१/१०/२०१८ ते दि. ०५/११/२०१८

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
दि. २७/११/२०१७ ते दि. २०/१२/२०१७
दि. १५/०५/२०१८ ते दि. ०८/०६/२०१८
दि. ०१/०८/२०१८ ते दि. ३१/०९/२०१८

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे आहेत.
दि. २२/१२/२०१७ ते दि. १३/०१/२०१८
दि. ०२/०३/२०१८ ते दि. २६/०३/२०१८

प्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. यावर्षी काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाची संधी मिळेल; परंतु प्रवासामध्ये काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासामध्ये वस्तू हरविणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड स्थूलमानाने प्रवासासाठी चांगला आहे.

खालील कालखंड प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत.
दि. २२/१०/२०१७ ते दि. ३१/१०/२०१७
दि. २८/०१/२०१८ ते दि. ०२/०३/२०१८
दि. २७/०३/२०१८ ते दि. १८/०४/२०१८
दि. १०/०६/२०१८ ते दि. ०४/०७/२०१८
दि. ०३/०९/२०१८ ते दि. १८/०९/२०१८

खालील कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना प्रवासाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहेत.
दि. २३/१२/२०१७ ते दि. ३१/१२/२०१७
दि. ०४/०३/२०१८ ते दि. १७/०३/२०१८
दि. ०४/०७/२०१८ ते दि. ०२/०९/२०१८

खालील कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. या कालखंडामध्ये प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही किंवा हरविणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये सावधगिरी बाळगावी.
दि. ०५/११/२०१७ ते दि. १०/१२/२०१७
दि. ०१/०१/२०१७ ते दि. २४/०१/२०१८
दि. १८/०३/२०१८ ते दि. २६/०३/२०१८
दि. १९/०४/२०१८ ते दि. ०२/०५/२०१८

सुसंधी / प्रसिद्धी
सुसंधी, प्रसिद्धीच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. विशेषत: दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड अपेक्षित संधी मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडात तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. या कालखंडात काहींना गुरूकृपा लाभेल.

तुमच्या आशा-आकांक्षा सफल होतील. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. नवीन परिचय होतील. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचे क्षेत्र व्यापक व विशाल होईल. नवीन परिचय होतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाटय़, चित्रकला, शिल्पकला व इतर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात व तुमच्या छंदात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमची कामे मार्गी लागतील.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी व कार्यामध्ये सफलता या दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत.
दि. २२/१०/२०१७ ते दि. ३१/१०/२०१७
दि.०७/०१/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. १४/०५/२०१८ ते दि. २५/०६/२०१८
दि. ०४/०७/२०१८ ते दि. ०१/०८/२०१८
दि. ०६/१०/२०१८ ते दि. १२/१०/२०१८

खालील कालखंड सुसंधीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
दि. ०३/०३/२०१८ ते दि. ०९/०५/२०१८
दि. २७/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता
प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता, सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, सहकार या सर्व क्षेत्रातील मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत यशदायक, लाभदायक ठरणार आहे. शक्यतो दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत आपण ज्या पदाची अपेक्षा करत आहात ते पद या कालखंडापर्यंत लाभणार आहे. वृत्तपत्रातून तुम्हाला प्रसिद्धी लाभेल. वरिष्ठांच्या, थोरामोठय़ांच्या प्रशंसेला तुम्ही पात्र व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कार्याचे, अनुभवाचे चीज होईल. प्रशंसा होईल. एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. मानसन्मानाचे योग येतील. पद, प्रतिष्ठा लाभेल. त्यामुळे महत्त्वाची कामे शक्यतो दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या कालखंडातच उरकून घ्यावीत.

तुमच्या यशाचा अनेकांना हेवा वाटेल. प्रतिष्ठा, अधिकार यावर्षी लाभणार आहे. तुमच्या यशाच्या आड आता कोणी येऊ शकत नाही. तुमची पावले प्रगतीच्या दिशेने पडणार आहेत. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. यावर्षी तुम्ही आघाडीवर राहणार आहात. नेतृत्त्व करणार आहात. नेतृत्त्व तुमच्याकडे आपोआप चालून येईल. तुम्ही तुमची योग्यता सिद्ध कराल.

खालील कालखंड प्रतिष्ठा, पद या दृष्टीने चांगले आहेत.
दि. २२/१०/२०१७ ते दि. १५/११/२०१७
दि. ०१/१२/२०१७ ते दि. १६/१२/२०१७
दि. १४/०१/२०१८ ते दि. ११/०२/२०१८
दि. १५/०४/२०१८ ते दि. १३/०५/२०१८
दि. २०/०८/२०१८ ते दि. १५/०९/२०१८

खालील कालखंडात मेष व्यक्तींनी आपल्या मानसन्मान, प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.
दि. १८/११/२०१७ ते दि. ३०/११/२०१७
दि. १८/१२/२०१७ ते दि. १३/०१/२०१८
दि. १३/०२/२०१८ ते दि. १३/०३/२०१८
दि. १७/०९/२०१८ ते दि. १५/१०/२०१८

खालील कालखंड मेष राशीच्या व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठेच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
दि. १५/०६/२०१८ ते दि. १२/०७/२०१८

सारांश, मेष राशीच्या व्यक्तींना हा कालखंड आíथक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरणार आहे. व्यवसायात आíथक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होतील. ज्यांच्या मनामध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना हे वर्ष खूपच अनुकूल ठरणार आहे. तेव्हा आता आपण मनाचा निर्धार करून नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने निर्धाराने पावले टाकावीत. आपणाला यश निश्चित प्राप्त होणार आहे.

सर्वसामान्यपणे मेष राशीच्या व्यक्तींना दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. ज्यांना नवीन संस्था काढायची आहे त्यांना हे वर्ष चांगले आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अनेक कामे मार्गी लागणार आहेत. एक अत्यंत समाधानाचे, सौख्याचे, यशाचे, प्रगतीचे, संतोषाचे असे हे वर्ष आहे. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. काहींना बढतीची शक्यता आहे. पगारवाढीची शक्यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा मिळणार आहे. तीर्थयात्रेचे योग आहेत. वैवाहिक सौख्य लाभेल. परदेश प्रवासाचे योग आहेत.

मात्र, आपली रास जर बिघडली तर आपल्याकडे उताविळपणा, घाईघाईने निर्णय घेणे, सांगोपांग अभ्यास न करता निर्णय घेणे हे दोष निर्माण होतात. तसेच काहींच्या स्वभावात धरसोडपणा निर्माण होतो. आपल्या रोखठोक बोलण्यामुळे व हुकूमशाही वृत्तीमुळे काहीजण नाराज होतात.

सारांश, आपण विचारपूर्वक निर्णय घेतले, सर्वाचे विचार ऐकून घेतलेत, उतावीळपणा, चटकन निर्णय घेण्याचा स्वभाव, रागीटपणा व अहंकार या गोष्टी जर सोडल्या व विनम्र वृत्ती ठेवली तर आपण आपल्या कर्तृत्वाने जीवनामध्ये यशाचे शिखर गाठू शकाल यात शंका नाही.

सुरुवातीला आपण मेष राशीची काही वैशिष्टय़े पाहिली. मात्र कोणत्याही पूर्ण शुद्ध स्वरूपात मेष व्यक्ती क्वचितच सापडतात. मेष राशीचे प्रमुख दोष म्हणजे उतावीळपणा, चंचलपणा, घाईघाईने निर्णय घेण्याची पद्धत, चौफेर लक्ष न ठेवणे हे होत. आपल्यापैकी काहीजण आरंभशूर असतात. म्हणजेच कोणत्याही नवीन कामात उत्साहाने सुरुवात करणे व काही काळानंतर ते मध्येच सोडून जाणे, तसेच जे मेंढरू पुढे असेल त्याच्या मागे विचार न करता इतर अनेक मेंढरे जातात व खड्डय़ात पडतात. त्याचप्रमाणे आपणही कोणत्याही गोष्टींचा, प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास न करता निर्णय घेता व अनेकदा खड्डय़ात पडता. काहींच्या स्वभावात धरसोडपणा असतो, दीर्घसूत्रीपणाचा अभाव असतो. तसेच आपल्या ताठर स्वभावामुळे इतरांचा सल्ला ऐकणे आपणाला कमीपणाचे वाटते. दुस-यांचे शांतपणे ऐकून घेणे हे आपल्या स्वभावात नसते. आपल्या परखड, रोखठोक बोलण्यामुळे काहीजण दुखावले जातात. आपल्यापैकी काहीजण भरकटत जातात. सतत गडबड, घाई, धावपळ यामुळे काहींच्या जीवाला कधीही स्वस्थता लाभत नाही. पतंगाची दोरी निसटल्यावर पतंग जसा भरकटत जातो तसे काहीजण दिशाहीन अवस्थेत चालत असतात. आपल्यापैकी काहीजण हट्टी असतात. काही रागीट व आडमुठे स्वभावाचे असतात तर काही गर्वष्ठि, अहंमन्य, उद्धट व जुगारी प्रवृत्तीचे असतात. आपण आपल्या मताबद्दल अधिक आग्रही असता. काहीवेळा आपले वागणे निर्दयी स्वरूपाचे वाटते. काहींच्या वागण्यात क्रौर्य डोकावते. काहींना राग, संताप आवरता येत नाही. आपली रास जर शनी, मंगळ या ग्रहांनी बिघडली तर वरील दोष प्रकर्षाने जाणवतात. आपण परिपूर्ण होण्यासाठी अधिकाधिक विनम्र व्हावयास शिकले पाहिजे. आपण जितके निरहंकारी, निगर्वी व विनयशील व्हाल तितके अधिक श्रेयस्कर ठरेल. आपण थोडे लवचिक धोरण ठेवावयास हवे. या संदर्भात तुकाराम महाराजांचे वचन महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे रहाती’.

उतावीळपणे केलेली कामे यशस्वी होत नाहीत. काही बाबतीत आपण धीर धरावयास हवा. याही बाबतीत तुकाराम महाराजांनी मोलाचा संदेश दिला आहे, ‘तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविण’. आपण उतावीळपणा, चटकन निर्णय घेण्याचा स्वभाव, रागीटपणा, अहंकार या गोष्टी सोडल्या तर आपण आपल्या कर्तृत्वाने यशाचे धनी व्हाल व खूप पुढे याल यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट