विजया दशमी अर्थात दस-या दिवशी नागपूर मेट्रो धावणार आहे. त्याचे लोकापर्यण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
नागपूर- विजया दशमी अर्थात दस-या दिवशी नागपूर मेट्रो धावणार आहे. त्याचे लोकापर्यण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या गतीला अधिक बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वेने पूर्ण केला. एअरपोर्ट ते खापरी या पाच किलोमीटरच्या मार्गावर विजेच्या सहाय्याने मेट्रो रेल्वे सुसाट धावली. ट्रायल पूर्ण झाल्याने आता मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरच्या विकासाला गती देणारा मेट्रो रेल्वे प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला काम सुरू होऊन अडीच वर्षे झाले. या अडीच वर्षांत ४६ टक्के काम पूर्ण झाले असून २ हजार २०० कोटी रुपये आतापयर्ंत खर्च करण्यात आले. ३०० हून अधिक पिलर (पिअर) आतापयर्ंत उभे झाले आहेत. ३८ किलोमीटरचा पूर्ण प्रकल्प पूर्ण व्हायला २०१९ हे वर्ष उजाडावे लागणार असले तरी एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर २३ सप्टेंबर रोजी मेट्रोने धावून यशस्वी टप्पा पूर्ण केला. कुठलीही चूक नको म्हणून बारीकसारीक सर्व तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महामेट्रोची यंत्रणा कामाला लागली आहे.
शहरातील वाहतुकीवरील ताण लक्षात घेता मेट्रो रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे हे नागपूरकरांनी बघितलेले स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा झाला आहे. एअरपोर्ट ते खापरीपयर्ंत मेट्रो धावल्याने आमचा विश्वास अधिक वाढला. प्रकल्पाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे श्रेय महामेट्रोच्या सर्व चमूचे असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
[EPSB]
सोसायटय़ांच्या माथी जीएसटीचे ओझे
[/EPSB]