जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. तेथे संरक्षण भिंत उभी राहिली असून अंतर्गत कामे सुरू आहेत.
राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. तेथे संरक्षण भिंत उभी राहिली असून अंतर्गत कामे सुरू आहेत. जैतापूर प्रकल्प नको, यासाठी शिवसेना आमदार राजन साळवी विष प्राषण करणार होते.
विष पिऊन जगणाऱ्या या आमदाराचा प्रकल्प विरोध हा त्या प्रकल्पात काँट्रक्ट मिळवण्यासाठीच होता, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी केली. नाणार येथे प्रस्तावित असलेला पेट्रोकेमिकल्स प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
राजापूर व लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ओणी येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत राणे बोलत होते.
दिल्लीत सभागृह सुरू असताना तेथे जनतेचे प्रश्न मांडायचे सोडून शिवसेनेचा खासदार गल्लीबोळात फिरत आहेत. आमदार राजन साळवींसह अन्य सर्वच आमदार आपासात भांडत आहेत. कोकणशी काहीही देणे-घेणे नसलेले पालकमंत्री कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याच्या गोष्टी करत आहेत.
कोकणच्या, रत्नागिरी ह्यजलच्या विकासाचे या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना काहीच देणे-घेणे नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकायच्याच आणि २०१९ मधील लोकसभा-विधानसभाही जिंकायचीच आणि आपली हक्काची माणसे निवडून द्यायची, असा निर्धार आज करा, असे आवाहन काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले.
ज्यांना लोकसभेत नीट बोलता येत नाही, प्रश्न मांडता येत नाहीत, ज्यांनी खंबाटा प्रकरणात ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून २७०० कुटुंबांना देशोधडीला लावले; ते खासदार विनायक राऊत काय विकास करणार? असा खडा सवाल उपस्थित करून अशा भ्रष्टाचारांना आता घरी बसवा, असे आवाहन राणे यांनी या वेळी केली.
गेली २० वर्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता उपभोगताना मिळालेल्या पदांच्या माध्यमातून लुटण्याचे काम शिवसेनेने केले आहे. या २० वर्षाच्या कालावधीत एक पूर्ण पिढी शिवसेनेने अधोगतीकडे नेली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध योजनांत भ्रष्टाचार करून स्वत: गब्बर झाले आणि जनता मात्र आहे तिथेच राहिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जि. प. आणि पं. स. सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या हाती द्या; आम्ही रत्नागिरह्य जिलचा परिपूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन इथल्या जनतेच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत भावनिक राजकारण करून निवडणुका जिंकणा-यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असेही राणे यांनी या प्रसंगी सांगितले.