Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeटॉप स्टोरीमुंबईसह राज्याला पावसाने झोडपले

मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून रेल्वेसह विमान वाहतूकीलाही पावसाचा फटका बसला.

मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात काल सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. सखल भागात पाणी साचले. रेल्वेसह विमान वाहतूकीला पावसाचा फटका बसला. भांडुपच्या खिंडी पाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. यात चार नागरिक जखमी झाले असून मुलुंडच्या खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जोरदार पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली.

मुंबईसह महाराष्ट्राच्या काळजात धडकी भरविणा-या पावसाने दिवसभर आपली दमदार बरसात सुरू ठेवली. कधी जोरदार सरी, तर कधी रिमझिम पाऊसधारा असे पावसाचे आजचे रूप होते. कालपासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केलेली असल्याने अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. सरकारने कालच शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली होती. अनेक शासकीय आणि खासगी अस्थापनातील महिलांना लवकर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

मुंबईसह राज्यभरात काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारीही आपली संथ बॅटींग सुरू ठेवली. रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने तिन्ही मार्गावरच्या लोकल गाड्या संथ गतीने धावत होत्या. २९ ऑगस्टच्या पावसात अनेकांना २०-२० तास अडकून पडावे लागले होते. आजही सकाळपासून आभाळ भरून आलेले होते. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. सकाळी अकराच्या सुमारास काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. उपनगरात तर अधूनमधून थांबत पावसाची बॅटिंग सुरूच आहे. येत्या २४ तासांतदेखील मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

रस्त्यांवर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सर्वाधिक पावसाची नोंद विक्रोळी येथे झाली. घाटकोपर, मुलुंड, धारावी परिसरातही जोरदार पाऊस झाला. मुंबईतली दहीसर नदी ओसंडून वाहू लागली होती. खबरदारी म्हणून नॅशनल पार्क बंद ठेवण्यात आले आहे. आरे कॉलनी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याऐवजी क्रमांक ३ वरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

पावसाचा कालपासून वाढलेला जोर आणि आजही मोठय़ा प्रमाणात पाऊस होण्याची हवामान खात्याने वर्तविलेली शक्यता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने मुंबई विकास प्राधिकरण परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल त्याबाबत अधिकृत घोषणा केली होती. मुंबई महापालिकेनेही आपल्या शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

डबेवाल्यांची सेवा बंद

पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांची आजची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी पावसाला न जुमानता, रडत-खडत जाणा-या ट्रेनने ज्यांनी कसेबसे कार्यालय गाठलेही असेल, त्या मुंबईकर चाकरमान्यांना डबे मिळेले नाहीत. डबेवाले मुंबईत रोज दोन लाखांवर डबे पोहोचवतात. उपनगरी रेल्वेसेवा मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांनी सेवा बंद ठेवली होती.

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे लाइनशी जोडलेल्या ७० रेल्वे स्थानकांच्या माध्यमातून डबेवाले अविरत आपली सेवा देतात. रेल्वेमुळे जलदगती सेवा देणे डबेवाल्यांना शक्य होते. दोन तासांच्या आत ते डबा पोहोचवतात.

या आधी ९ ऑगस्टला डबेवाल्यांनी मराठा आरक्षण मोर्चात भाग घेतल्याने आपली सेवा बंद ठेवली होती. त्यानंतर २९ ऑगस्टला मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे दुस-या दिवशी त्यांना डबे पोहोचवता आले नव्हते.

केळवा बीच पर्यटकांना फटका!

पालघर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वा-यासह पावसाने धुमाकूळ घातला असून पावसामुळे समुद्र किना-यावरील गावांच मोठे नुकसान झाल आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या केळवे परिसरातही घरे व हॉटेलांची हानी झाली असून त्यामुळे पर्यटकांना चांगलाच फटका बसला आहे.

केळवे येथील अनेक हॉटेलांचे पत्रे वादळाने उडून गेले आहेत. त्याचबरोबर तेथील किना-यावरील सुरुच्या बागेतील झाडे उन्मळून पडली असून बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे किना-यांची रयाच गेली आहे. जिल्ह्यात अनेक गावांतील घरामधे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वादळ सुरूच असल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पश्चिम रेल्वेने डहाणू-विरारसह अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्या आहेत.

डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने काल सायंकाळी मुंबईहून गुजरात व दिल्लीकडे जाणा-या गाडय़ा तब्बल तीन तास विविध रेल्वे स्थानकांत अडकून पडल्या होत्या. रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये पाणी तुंबल्यामुळे आजही वाहतूक खूपच मंदावली आहे.

राज्याला पावसाने झोडपले

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने आजही जोर कायम ठेवला. राज्यातील सर्व धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून धरण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणातून पाणी सोडल्याने पंढरपूरसह आजूबाजूच्या गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्प गेल्या अनेक वर्षात भरण्याच्या स्थितीत आहे. एकूण राज्यात पावसाने जोरदार कमबॅक केल्याने मराठवाडय़ावरील दुष्काळाची छाया पुसली जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील धरणे ओव्हर फ्लो

मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासू जोर वाढला आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सिंहगड रस्ता परिसरातल्या काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेक्स तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ष्टद्धr(39)ातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. सोलापूरचे उजनी धरणही पूर्ण भरले आहे. कोल्हापूरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचे वारणा ही धरणंही पूर्ण भरली आहेत.

विमानसेवेला फटका

पावसामुळे विमानांच्या उड्डाणांनाही फटका बसला आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी साचल्याने ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद ठेवली होती. १४ क्रमांकाच्या धावपट्टीवरून काही प्रमाणात उड्डाणे झाली.

जोरदार पावसाचा फटका विमान प्रवाशांनाही बसला असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई विमानतळावर पावसामुळे अक्षरश: तळे साचल्याने विमानांच्या उड्डाणांना अडथळे येत आहेत. विमानतळावरील काही भागच सध्या सुरु असून इतर अनेक धावपट्टय़ांवर पाणी साचल्याने येथील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बाहेरुन येणा-या अनेक विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून ती इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. दरम्यान, देशांतर्गत हवाई सेवा पुरवणा-या विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची किंवा उड्डाणाचे वेळापत्रक बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका!

मुंबईकरांनी यंदाच्या पावसाळ्याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. २९ ऑगस्टच्या अनुभवानंतर कालच्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक अफवा व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. तरी या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे.

जोरदार पावसानंतर मुंबईमध्ये वादळ येणार आहे तसेच २६ जुलैपेक्षा भयंकर पाऊस मुंबईमध्ये होणार आहे, अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या मेसेजेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी या मेसेजेचे स्क्रीनशॉर्ट ट्विट करुन मुंबई पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांकडे याबद्दल विचारणा केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अधिकृत सुत्रांकडून माहिती मिळेपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईवर ढग जमल्याचे सॅटेलाईट फोटो तसेच परदेशातील वादळांचे फोटो मुंबईवर वादळ घोंघावतेय अशा माहितीसहित व्हायरल केले जात आहे. हे मेसेजस खरे वाटावे म्हणून अशा अनेक खोटय़ा मेसेजसमध्ये हवामान खात्याचे नाव टाकून ते फॉरवर्ड केले जात आहेत. तरी अशाप्रकारचे कोणतेही वादळ मुंबईवर घोंघावत नसून, १७ तारखेपासून पुढील तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवली होती. कालपासून सतत पाऊस पडत असल्याने असे मेसेजेस व्हायरल झाले असल्याने अनेकजण त्याची सत्यता पडताळून न पाहाता हे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत. अशाप्रकारे मेसेजेसची सत्यता न पडताळून पाहता ते फॉरवर्ड करणा-यांविरुद्ध कोणी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवण्याच्या गुन्हा अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे मत सायबर सुरक्षा तज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले. तसेच असे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहा आणि मगच तो फॉरवर्ड करा, असा सल्लाही माळी यांनी नेटक-यांना दिला.

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

विरार- वसईतील पाऊस १७ वर्षीय तरूणीच्या जीवावर बेतला. कॉलेजमधून घरी परतत असताना मैत्री शाहा या तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना झाली. काल झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले. त्यामुळे येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. त्यात या तरूणीने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने बोरिवली-दहीसर दरम्यान दरवाजातून ती लोकलबाहेर पडली. त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.

राज्यातली धरणे भरली, नदीकाठच्या गावांना ‘अलर्ट’

मुंबईसह कोकम व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून राज्याच्या अन्य भागातही संततधार सुरू आहे. राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केले असून मंगळवार दुपारपासून सरीवर सरी कोसळत आहेत. रात्रभर सुरु असणा-या पावसाने मुंबईत बुधवारी दुपारपासून थोडी उसंत घेतली असली तरी रिमझिम पाऊस सुरुच आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट