कोल्हापूरमधील सांगवडे येथे विहिरीतील गाळ काढत असतांना अचानक क्रेनचा रोप तुटून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापूर- कोल्हापूरमधील सांगवडे येथे विहिरीतील गाळ काढत असतांना अचानक क्रेनचा रोप तुटल्याने अपघात झाला. या अपघातात तीन कामगार जागीच ठार झाले तर एकजण गंभार जखमी आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी इचलकरंजीमधील सांगवडे येथे घडली. त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामचंद्र कालोजी साळवी, भैरूलाल गंगाराम माळी आणि बाबूराव शामराव वडार हे तीन कामगार या अपघातात ठार झाले. तर शिवाजी दत्तू पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.
संजय अण्णा पाटील या शेतक-यांच्या शेतात विहिर खोदण्याचे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम सुरू होते. विहिरीत काही कामगार उतरून गाळ उपसत होते आणि क्रेनच्या ट्रॉलीत भरत होते. ट्रॉली वर जात असताना अचानक क्रेनचा दोर (रोप) तुटला. ही ट्रॉली विहिरीत काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.