देवनार कचरा भराव भूमीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश नारायण राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मुंबई – देवनार कचरा भराव भूमीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश नारायण राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा सर्व प्रकार शिवसेना-भाजपाच्या घाणेरडय़ा राजकारणाचा परिपाक असल्याचे स्पष्ट करत मुंबईकरांना वेठीस धरणा-या या आगीची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
या कचरा भराव भूमीमध्ये अनेक समाजकंटक राहत असून त्यांच्याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कचरा भराव भूमीतील कच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदार नेमल्यानंतर त्या जागेचा विकास करण्यासाठी महापालिका आणि कंत्राट कंपनीला का परवानगी दिली गेली नाही. जमीन हस्तांतरण का झाली नाही.
आता कोणालाही कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे या चोराच्या उलटय़ा बोंबाच असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. देवनारमधील आग लागली की लावली? शिवसेना-भाजपाच्या लोकांना हे चांगलेच ठाऊक आहे. संरक्षक भिंत नाही की सीसीटीव्ही नाही. सगळे तडीपार गुंड आतमध्ये राहत असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.